#‎अखंडभारत‬

#‎अखंडभारत‬

अमेरीकेने इराक-इराण-अफगाणिस्तानवर ताबा मिळवला १० वर्ष सरकार चालवल, आणि लष्करी तळ मांडून ठेवले आहेत, रशिया कमी नाही, चीनने तिबेट खाल्ला, भूतान चिमटीत पकडून ठेवला आहे, नेपाळची गोची करुन ठेवली आहे, पाक-बांगलादेश चीनच्या इशार्यावर नाचतात, म्यानमारची परिस्थिती फारशी वेगळी नाही.
अश्यावेळी भारतीय उपखंडातले देश भारताच्या नेतृत्वाखाली एकत्र येउ शकले तर काय हरकत आहे, योग्य नियोजन असेल तर भारतीय उपखंड अभेद्य असेल, प्रशिक्षित आणि अर्धविकसीत मनुष्यबळ सर्वात जास्त भारतीय उपखंडात उपलब्ध आहे, व्यापारासाठी कच्चा माल सर्वात जास्त इथेच उपलब्ध असणार आहे आणि हे सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असणार आहे. युरोप-अमेरीके चीन-जपानला मागे टाकण्याची हिच संधी आहे.
पाकिस्तान-चीन दरवर्षी इंच-इंच पुढे सरकत आहे, ६० वर्षांपूर्वीच्या बावळटपणामुळे काश्मीर-अक्साईप्रदेश आपण गमावला आहे, आता अरुणाचलप्रदेश पण सोडायचा का ? प.बंगाल-केरळ-आसाम धर्माच्या गणितावर वेगळे व्हायची मागणी करायला लागले तर तोडणार का अजुन तुकडे?
offence is the best defence असताना जात-धर्माची गणित मांडणारे आणि भारतीय उपखंडांतल्या देशांच्या एकत्र येण्याला विरोध करणारे विद्वान-विचारगट अमेरिका-चीनच्या पैश्यावर पोसले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निदान माझ्या विचारातले "अखंड भारत" आणि "अखंड हिंदुस्तान" हे दोन्ही वेगळे आहेत.
अर्थात मला कोणीच विचारत नाहीत हि गोष्ट वेगळी!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा