>भारत माझा देश आहे
(म्हणूनच आम्ही विदेशात नोकऱ्या मिळवून तिथे स्थाईक होऊन त्या देशांना डेव्हलप करायच्या प्रयत्नात असतो)
>सारे भारतीय माझे बांधव आहेत
(आम्ही सतत एकमेकांचा मत्सर करत असतो, तुझी जात ती..... तर माझी जात हि.... आणि चार पाचशे वर्षापूर्वीचे उकरून काढून भांडत बसण्यात आमचा हात तर कुठलाच देश करू शकत नाहीत)
>माझ्या देशावर माझे प्रेम आहे
(म्हणूनच आम्ही रस्त्यावर थुंकतो, नियम मोडतो, आणि फक्त आपली ताकद सिद्ध करायचा प्रयत्नात असतो)
>माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
(आम्हाला वेस्टर्न परंपरा जास्त भावतात, त्यां देशातील सणांचे (वेलेन्टाईन्स डे, रोज डे, प्रपोज डे ई.) मेसेज लगेच फॉरवर्ड होतात, आमचे सण लक्षातही नसतात)
>मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवीन
(म्हणूनच whatsapp वर गुरुजनांवर आम्ही उत्तम प्रकारे विनोद करू शकतो, पालकांना घरा बाहेर काढतो,
आणि रस्त्यावरून चालणाऱ्या, वडीलधार्या माणसांशी वयाचा मान न ठेवता आरेरावीने बोलतो)
>आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन
(आम्हाला साधा गाडीवरून ओव्हरटेक जरी कोणी केला तरी आम्हाला त्याचा राग येतो, पुढे जाऊन त्याला गाठून कशा शिव्या घालता येतील....आपली भाईगिरी कशी सिद्ध करता येईल....... वगैरे )
>माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे
(आम्ही एकमेकांवर सतत कुरघोडी करतो, आमचा आवडता वाद म्हणजे जातीवाद)
>त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे
(आम्ही एकमेकांचे पाय घेचतो..... मीच कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करतो..... कोणि
संकटात असल्यास त्याला मदत करायचे सोडून त्याचे vdo चित्रीकरण करून आपल्या पेज वर किंवा whatsapp वर कसे सर्वांचा आधी पाठवता येईल याचा प्रयत्न करतो)
आता यात काही विनोद नाहीये, तुमच्या आजूबाजूच्या 10 लोकांचा तुम्ही अभ्यास केल्यास- या 10 लोकांमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा आहात....
वरील (कंसात लिहिलेल्या) अर्थाप्रमाणे त्यातील काही लोक वागताना दिसतील....
आता सर्वच जण असे चुकीचे वागतात असे नाही, आता ज्या लोकांना या शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेचा अर्थ माहिती आहे आणि समजला आहे ते याचे आचरण योग्य पद्धतीने करतात, ज्यांना समजला नाही ते वरील कंसात
लिहिलेल्या अर्थाप्रमाणे वागतात..... तोडा आणि राज्य करा या इंग्रजांचा पद्धतीला पूर्णविराम देण्याचे आपल्या
हातात आहे.
या 5 ओळींचा प्रतिज्ञेत आपली पूर्ण भारत संस्कृती आहे, इतरांची कॉपी करून आपण पुढे जाऊच शकत नाही, वेगळेपण सिद्ध केले तरच पुढे जाऊ शकतो, जर का आपण या प्रतिज्ञे प्रमाणे वागलो, आणि सर्व एकत्र येऊन काम करायला लागलो, तर जगात पहिल्या नंबरचा देश व्हायला आपल्याला 5 वर्षे पुष्कळ झाली......
जय हिंद
(म्हणूनच आम्ही विदेशात नोकऱ्या मिळवून तिथे स्थाईक होऊन त्या देशांना डेव्हलप करायच्या प्रयत्नात असतो)
>सारे भारतीय माझे बांधव आहेत
(आम्ही सतत एकमेकांचा मत्सर करत असतो, तुझी जात ती..... तर माझी जात हि.... आणि चार पाचशे वर्षापूर्वीचे उकरून काढून भांडत बसण्यात आमचा हात तर कुठलाच देश करू शकत नाहीत)
>माझ्या देशावर माझे प्रेम आहे
(म्हणूनच आम्ही रस्त्यावर थुंकतो, नियम मोडतो, आणि फक्त आपली ताकद सिद्ध करायचा प्रयत्नात असतो)
>माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
(आम्हाला वेस्टर्न परंपरा जास्त भावतात, त्यां देशातील सणांचे (वेलेन्टाईन्स डे, रोज डे, प्रपोज डे ई.) मेसेज लगेच फॉरवर्ड होतात, आमचे सण लक्षातही नसतात)
>मी माझ्या पालकांचा , गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवीन
(म्हणूनच whatsapp वर गुरुजनांवर आम्ही उत्तम प्रकारे विनोद करू शकतो, पालकांना घरा बाहेर काढतो,
आणि रस्त्यावरून चालणाऱ्या, वडीलधार्या माणसांशी वयाचा मान न ठेवता आरेरावीने बोलतो)
>आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन
(आम्हाला साधा गाडीवरून ओव्हरटेक जरी कोणी केला तरी आम्हाला त्याचा राग येतो, पुढे जाऊन त्याला गाठून कशा शिव्या घालता येतील....आपली भाईगिरी कशी सिद्ध करता येईल....... वगैरे )
>माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे
(आम्ही एकमेकांवर सतत कुरघोडी करतो, आमचा आवडता वाद म्हणजे जातीवाद)
>त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे
(आम्ही एकमेकांचे पाय घेचतो..... मीच कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करतो..... कोणि
संकटात असल्यास त्याला मदत करायचे सोडून त्याचे vdo चित्रीकरण करून आपल्या पेज वर किंवा whatsapp वर कसे सर्वांचा आधी पाठवता येईल याचा प्रयत्न करतो)
आता यात काही विनोद नाहीये, तुमच्या आजूबाजूच्या 10 लोकांचा तुम्ही अभ्यास केल्यास- या 10 लोकांमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा आहात....
वरील (कंसात लिहिलेल्या) अर्थाप्रमाणे त्यातील काही लोक वागताना दिसतील....
आता सर्वच जण असे चुकीचे वागतात असे नाही, आता ज्या लोकांना या शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेचा अर्थ माहिती आहे आणि समजला आहे ते याचे आचरण योग्य पद्धतीने करतात, ज्यांना समजला नाही ते वरील कंसात
लिहिलेल्या अर्थाप्रमाणे वागतात..... तोडा आणि राज्य करा या इंग्रजांचा पद्धतीला पूर्णविराम देण्याचे आपल्या
हातात आहे.
या 5 ओळींचा प्रतिज्ञेत आपली पूर्ण भारत संस्कृती आहे, इतरांची कॉपी करून आपण पुढे जाऊच शकत नाही, वेगळेपण सिद्ध केले तरच पुढे जाऊ शकतो, जर का आपण या प्रतिज्ञे प्रमाणे वागलो, आणि सर्व एकत्र येऊन काम करायला लागलो, तर जगात पहिल्या नंबरचा देश व्हायला आपल्याला 5 वर्षे पुष्कळ झाली......
जय हिंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा