एक मुलगा बापाला प्रश्न करतो , देव आधी कि माणूस. नग अंधश्रद्धेवर उपदेश.

*असे मेसेज फक्त आणि फक्त हिंदु धर्माच्या बदनामीसाठीच पाठवण्यात येतात.*
*इतर धर्मावर मेसेज पाठवले कि पाठवणाऱ्याचा  मुडदा पडलाच समजा !!*

तरीसुद्धा घ्या उत्तर :

देव म्हणजे मानवाचे आदर्श. तत्कालीन संस्कृतीचे सर्वोच्च प्रातिनिधिक रुप.
देवाचे चित्र पहाता त्यात अवयव अस्त्र वस्त्र दागिने सर्वात अतिशयोक्ती म्हणावी इतकी उधळण असते.
हिंदु धर्म कथा पुराण स्त्रोत्र सगळ्यात चांगले वागण्याचा उपदेश आहे आणि वाईट वागणाऱ्याला जशास तसे फळ मिळते ह्याचे दाखले आहेत.
जे चित्र किंवा शिल्पकला आपण पहातो त्यातले देव किंवा इतर समूह तत्कालीन संस्कृतीच्या कल्पनेनुसार आहेत.
ज्या संतांनी देवी किंवा पारलौकिक अनुभव व्यक्त केलेत त्यात जास्त करुन अमुर्तता आहे किंवा पारंपरिक रुप आहे उदाहरणार्थ विठ्ठल.

पूर्वजांनी दिलेल्या वारशानुसार देवाचे काम समस्या सोडवणे नसून मानवी जीवनास सकारात्मक वळण देणे आहे.
म्हणजेच सध्या ज्या समस्या आहेत त्या माणसानेच सोडवायच्या आहेत. आणि त्यासाठी जे मनोधैर्य लागते , आपल्या विश्वासानुसार त्या दैवताकडे त्या मनोधैर्याची मागणी करुन परिश्रम करायचे आहेत.
भ्रष्टाचार बलात्कार अत्याचार आत्महत्या मानवी समस्या आहेत, आणि मानवानेच सकारात्मक वृत्तीने सोडवायच्या आहेत.
पूर्वीपासून मंदिर प्रशासन गरजूंना सहाय्य करत आहेत, रुग्ण विद्यार्थी अपंगाना मदत करण्यात मंदिर नेहमीच दिसून येतात.
मुख्य म्हणजे मंदिरांचे हिशोब सार्वजनिक असतात. देणग्यांचे हिशोब तपासता येतात. इतर धार्मिकांकडे मागता का हिशोब?

काळा टिका : नजर लागू नये : काळ्या टिक्यामुळे सौंदर्यात बाधा येते , त्यामुळे कुकर्म करणाऱ्यांपासून संरक्षण होते

लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. अपघात किंवा दुखापत झाल्यानंतर उपयोगी असतात.

पुजेस उपस्थित रहाणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने हाती घेतलेले कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सकारात्मक मानसिक बळ लाभते

बाबाबुवा हिंदु धर्मात नाहीत. किंबहुना बाबाबुवांकडे हिंदु देवतांची भ्रष्ट नक्कल असते.

कुंडली म्हणजे प्राचीन जेनेटिक्स. मिळत्याजुळत्या डीएनएचा संकर झाल्यास संततीमध्ये विकृती होते. कुंडली जुळणे म्हणजे

यज्ञात समर्पण वृत्ती महत्वाची असते , जी प्रत्येक कार्यात आवश्यक असते.

चिकित्सा म्हणजे आपल्याला असलेल्या माहितीचे तपासणी करून ज्ञानात रूपांतर करणे. ते तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये दिसत नाही.

- -

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा