लोकमान्य : जुलै २३,इ.स. १८५६ -ऑगस्ट १, इ.स. १९२०

 http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/58/Bal_G._Tilak.jpg 
इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"  त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे.

९१ वर्षांपूर्वी टिळक ज्या गोष्टींची चिंता करत होते त्या अजूनही थोड्या फार प्रमाणात आहेतच.गटारीच्या शुभेच्छा देणारे टिळक पुण्यातीथीला मात्र गायब !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा