सध्या दलित - मुस्लिम ऐक्याचे वारे वहात असल्याचे भासवले जाते.
आंबेडकरानी हिंदु ख्रिश्चन आणि इस्लाम हे तीन्ही धर्म नाकारले होते, मग हि एकी कुठुन आली?
जर अशी एकी अभिप्रेत असती तर आंबेडकरानी बौद्ध धर्म स्विकारला नसता, इस्लाम कुबुल केला असतात. तसे घडले नाही, मग आता काय झाले?
हा आंबेडकरांचा विश्वासघात कि जनतेचा ?
आंबेडकरानी जे 60 वर्षांपुर्वी नाकारले तेच आज जनतेच्या माथी मारले जात आहे का?
बौद्ध म्हणायला हवे पण नेतेच दलित असा उल्लेख करुन जखम भळभळती ठेवत आहेत.
बौद्ध-मुस्लिम एकी नाही म्हणत. दलित-मुस्लिम म्हणतात, म्हणजे समाज कुठेही असला तरी दलितच का? का मागास ठेवला आहे समाज गेली 60 वर्षे? हिंदु धर्म अन्याय करुन प्रगती रोखत होता, आरक्षणानंतर सुद्धा समाज मागास दलितच कसा राहिला?
ज्यांचा उद्घोष केला जातो त्या भीमरावांचा आदर्श ठेवुन निम्मे सुद्धा शिक्षण पुर्ण करु न शकलेले नेते बनले. ज्यानी जिद्दीने शिक्षण घेतले ते जातीपासुन दुर झाले. असे का ह्याचा अर्थ गेल्या 60 वर्षात कोणत्याच नेत्याने समजावुन सांगितला नाही.
ब्राम्हण उच्चवर्ण सवर्ण वैदीक अन्याय असे शब्द वापरुन समाजत तेढ वाढवली गेली, पण एकही समाजउपयोगी कार्य दिसले नाही.
आंबेडकरानी आरक्षण हे हजारो वर्षे अन्यायाच्या खाईत पडलेल्या समाजाच्या उन्नतीचे साधन मानले होते.
पण आज आरक्षण हे कुंपण आहे.
आरक्षणाने निवडणुका जिंकता येतात.
जगण्याच्या शर्यती नाही.
तिथे कुंपण ओलांडणाराच संघर्ष करु शकतो.
दुर्दैवाने आज ज्यानी कुंपण मोडुन जग जिंकण्यासाठी मर्गदर्शन करायला पाहिजे, ते कुंपणाचे फायदेच सिद्ध करत आहेत.
आंबेडकरानी हिंदु ख्रिश्चन आणि इस्लाम हे तीन्ही धर्म नाकारले होते, मग हि एकी कुठुन आली?
जर अशी एकी अभिप्रेत असती तर आंबेडकरानी बौद्ध धर्म स्विकारला नसता, इस्लाम कुबुल केला असतात. तसे घडले नाही, मग आता काय झाले?
हा आंबेडकरांचा विश्वासघात कि जनतेचा ?
आंबेडकरानी जे 60 वर्षांपुर्वी नाकारले तेच आज जनतेच्या माथी मारले जात आहे का?
बौद्ध म्हणायला हवे पण नेतेच दलित असा उल्लेख करुन जखम भळभळती ठेवत आहेत.
बौद्ध-मुस्लिम एकी नाही म्हणत. दलित-मुस्लिम म्हणतात, म्हणजे समाज कुठेही असला तरी दलितच का? का मागास ठेवला आहे समाज गेली 60 वर्षे? हिंदु धर्म अन्याय करुन प्रगती रोखत होता, आरक्षणानंतर सुद्धा समाज मागास दलितच कसा राहिला?
ज्यांचा उद्घोष केला जातो त्या भीमरावांचा आदर्श ठेवुन निम्मे सुद्धा शिक्षण पुर्ण करु न शकलेले नेते बनले. ज्यानी जिद्दीने शिक्षण घेतले ते जातीपासुन दुर झाले. असे का ह्याचा अर्थ गेल्या 60 वर्षात कोणत्याच नेत्याने समजावुन सांगितला नाही.
ब्राम्हण उच्चवर्ण सवर्ण वैदीक अन्याय असे शब्द वापरुन समाजत तेढ वाढवली गेली, पण एकही समाजउपयोगी कार्य दिसले नाही.
आंबेडकरानी आरक्षण हे हजारो वर्षे अन्यायाच्या खाईत पडलेल्या समाजाच्या उन्नतीचे साधन मानले होते.
पण आज आरक्षण हे कुंपण आहे.
आरक्षणाने निवडणुका जिंकता येतात.
जगण्याच्या शर्यती नाही.
तिथे कुंपण ओलांडणाराच संघर्ष करु शकतो.
दुर्दैवाने आज ज्यानी कुंपण मोडुन जग जिंकण्यासाठी मर्गदर्शन करायला पाहिजे, ते कुंपणाचे फायदेच सिद्ध करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा