हिंदुत्व, जातीयवाद आणि आरक्षण

रोमन-प्रोटेस्टंट , शिया-सुन्नी असे ख्रिश्चन मुस्लिम धर्मियात जाती-पंथ आहेत, पण संविधानाचे हक्क लाभ अधिकार आरक्षण घेताना ते फक्त ख्रिश्चन किंवा मुसलमान असतात. कोणताही ख्रिश्चन किंवा इस्लामी धार्मिक नेता स्वत:च्या पंथासाठी वेगळे आरक्षण हक्क मागत नाही.
हिंदुंवर टीका करताना तर एकजुट असतेच
ह्यातुन काय शिकावे : धार्मिक एकता.
आपापसात कितीही भांडले तरी परक्यांविरुद्ध एकत्रच येतात.

आरक्षणाची वेळ येते तेव्हा हिंदुन्मध्ये शेकडो जाती दाखवल्या जातात. प्रत्येक जातीचा एकतरी नेता असतो. पण आज पर्यंत ह्या जातीयवादी नेत्याना एकत्र येऊन जातींमधले भेद मिटवता आले नाही, प्रत्येक वेळी फक्त तेढ वाढते.

गेली 60 वर्षे आरक्षण असुनही हिंदु जाती मागासच कश्या ? आरक्षणाने प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली. ह्याचे खापर हिंदुत्वावर फोडण्यात येते. पण सत्तेवर तर कायम हिंदुत्वविरोधी पक्षच होते. गरीबी हे आमचा दागिना असल्याचे सतत सांगितले गेले. रोजगार देण्याऐवजी भत्त्याच्या नावाखाली भीक मागण्याची सवय लावली गेली.
मग सर्व संधी अधिकार असताना सुद्धा कमी न झालेल्या जातीयवादाला जबाबदार कोण ?

परदेशी देणग्यांवर पोसलेले निधर्मी-सर्वधर्मी विचारवंत पुस्तक व्याख्यान चर्चासत्र भरवुन हिंदुना हिंदुत्वाविषयी गैरसमज करणारे पोस्ट मेसेज शेअर करतात. त्यामागचे सत्य जाणुन न घेता, तथाकथित बुद्धीवादी तेच उष्टे चघळत बसतात.

जगातल्या सर्व आधुनिक आणि विकसीत देशाना स्वत:चा धर्म आहे, सर्व जागतिक नेते स्वत:ची धर्म चिन्हे अभिमानाने मिरवतात.
सोशल किंवा न्युज मिडीयाचे मालक धार्मिक असतात, आपल्याला विकणायात येणारी प्रत्येक वस्तु व सेवा धार्मिक व्यक्तीच बनवतात. आपले रक्षण करणारे सैनिक व पोलिस धार्मिक असतात, आपले आयुष्य वाढवणारे डॉक्टर धार्मिक असतात.

मग आपणच मागे का? कारण परकिय आक्रमण होत असताना आपण विज्ञानापेक्षा धार्मिक रुढीना महत्व दिले, जर रुढी मागचे ज्ञान परखडले असते आणि ज्ञानसाधनेची तपश्चर्या केली असती तर आज आपण विज्ञान व धर्म हया दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा