महाराज निधर्मी ?

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.
*उत्तर* :  इष्टदेवतेसमोर  युद्धपुर्व बळी देणे ही तत्कालीन समाजामान्य प्रथा होती, शत्रूचे शीर धडावेगळे करताना काही वाटू नये म्हणून बळी दिले जात असत. पुढे हीच रीत मान्य पावली आणि देवांसाठी बळी देण्यात येऊ लागले.
■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.
*उत्तर* : महाराज देवभक्त होते, विशेषकरून शिवशंकर , म्हणून रायरेश्वरचरणी स्वराज्याची शपथ घेतली, बहुतेक सर्व गडांना शंकराचे नाव आहे.
■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.
*उत्तर* : लिंबू मिरची प्रथमोपचारासाठी असते, आणि तत्कालीन परीस्थितीत सर्वोत्तम.  महाराज देवभक्त होते, ह्याचा पुरावा महाराजांच्या पत्रव्यवहारात आहे.
■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले.
*उत्तर* :  मनुस्मृती हजारो वर्षे प्राचीन आहे, त्यात तत्कालीन नियम किंवा संकेत आहेत जे समाजास एकसंध ठेवू शकत होते. मनुस्मृतीच्या काळात समुद्रापलीकडे व्यापार होता ह्याचे पुरावे जगभर उपलब्ध आहेत. शूर्पारक (नालासोपारा) बंदर तर आपल्या जवळचे.
■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.
*उत्तर* : सत्यनारायण १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. इंग्रजांविरुद्ध जनता एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक पूजन सुरू झाले. सत्यनारायण पुजा नैतिकतेची कथा आहे, सत्य बोलावे, दिलेले वचन मोडू नये हा कथेचा सार आहे. सत्यनारायण नाकारणारे पक्षासकट बुडाल्याचे उदाहरण महाराष्ट्रतच आहे!!
■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.
*उत्तर*: अमावस्या अशूभ? हिंदु तर अमावास्येला दीपपुजन करतात. धर्मग्रंथ लिहिले गेले तेव्हा वीजेवर मानवी हुकुमत नव्हती. अमावास्येच्या अंधारात प्रवास किंवा इतर कार्य करताना चुक होण्याची संभावना असल्याने अशा गोष्टी न करण्याचा कटाक्ष होता.
■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या
*उत्तर* : सतीप्रथा मोजक्या राजघराण्यात होती. आणि सती प्रथा ऐच्छिक होती. मात्र जबरदस्तीने केली जाणारी सतीप्रथा अन्यायकारक होती. तरीसुद्धा इतर धर्मग्रंथात विधवा स्त्रीयांविषयी केलेल्या उपदेशांपेक्षा हे बरे. मनुस्मृतीत स्त्रीयांना संपत्तीचा समान हक्क दिला गेला आहे. बाबासाहेबांनी हिंदु कोड मनुस्मृतीवर आधारित केले, आणि तसे भाषण संसदीय कामकाजात अधिकृत आहे.
■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.
*उत्तर* : महाराज लढाईच्या आधी व नंतर कुलदैवत तुळजाभवानीचे पूजन करत. आजही सर्वच गडांवर देऊळ आहेत. आईसाहेबांनी स्वराज्य स्थापनेपुर्वी ठिकठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता.

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.
*उत्तर* : महाराजांचे जनसेवेचे कार्य हिंदु राजांच्या परंपरेतले आहे. इक्वाक्षू कुळातील राजांचे हे वैशिष्ट्य आहे

-----
तात्पर्य :
हे प्रश्न विचारणारे कोणत्या विचारसरणीचे असतील हे त्यांच्या हिंदु धर्मावर टीका करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांतुन दिसून येते.

*महाराजांचे व एकूणच स्वराज्याचे विरोधक कोण होते ? मुघल आदिलशाही निजामशाही कुतुबशाही सिद्दी काही प्रमाणात महाराजांचे मातृकुल*.

आज जे महाराजांच्या नावाने हिंदु धर्मातील अंधश्रद्धा दुर करण्याचे मेसेज पाठवतात ते महाराजांच्या विरोधकांच्या वंशजांच्या कळपात आहेत.

*आज अंधश्रद्धानिर्मूलन किंवा हिंदुधर्मविरोध अशा प्रकारचे कार्य करणारे लोकांचा सोशल व प्रिंट मिडीयावर सुळसुळाट झाला आहे. इतर धर्मांवर चुकूनही एक शब्द न काढणाऱ्या ह्या ढोंगी लोकांचे काय करावे?*

*दुरदृष्टी असलेल्या महाराजांच्या खास व्यक्तीमध्ये असे लोक नव्हते ह्याचमुळे महाराजांपुढे नतमस्तक होते!!*

राग आला तर वाल्या प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे

*कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषूकदाचन* तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फलाची अपेक्षा करु नकोस असे हिंदु धर्म सांगतो.

१) ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकार
बापू बुवा हे हिंदु धर्मात मान्य नाहीत. गरीबी हा जागतिक प्रश्न आहे ख्रिस्ती अमेरिका-युरोप, इस्लामीक मध्यपूर्व, आदिवासी आफ्रिका, बौद्ध जपान-थायलंड-म्यानमार इथे गरीबी आहेच.

२) विद्येच्या देवता असल्या तरी त्यांना प्रसन्न करण्यासाठी अभ्यास मेहनत सराव करावा लागतो.

३) भविष्य म्हणजे स्थल-काल-अवकाश ह्यांच्या हजारो वर्षांच्या अभ्यासातून मांडलेले ठोकताळे. त्यात एखाद्या घटकात फरक घडून आला तरी भविष्य बदलते, quantum mechanics हेच सांगते.

४) उपवास म्हणजे उप विषती इति. देवाच्या सानिध्यात रहाणे. शास्त्रानुसार देवाच्या सानिध्यात रहाण्यासाठी उग्र आहार (लसूण कांदा मांसाहार) वर्ज्य आहे. हा उपवासाचा अर्थ. त्यात पुढे धान्य आणि मसाले जोडले गेले.

५) नवस केला तरी कर्म करावेच लागते.

६) देव सर्वत्र आहे आणि कुठेही नाही. हे तुकाराम सांगतात.

७) जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. लोक तर घरात बिछान्यावर मरतात. देवाचे कार्य वाचवण्याचे नसून तुम्हाला जगण्यासाठी धैर्य देण्याचे आहे.

८) देव चोरीला जात नसून देवाच्या मौल्यवान मुर्त्या आणि दानपेट्या चोरीला जातात. हा मानवी अवगुण आहे. असे होऊ नये ह्यासाठी आपण जागृती करायची असते.

९) देव अंगात येणे हा प्रकार हिंदु धर्मात नाही. ती मानसिक अवस्था आहे, त्यावर उपचार करता येतात.

१०) देव आजार बरा करतो? कोणत्या देवाने सांगितले? देव तुम्हाला उपचार सहन करण्यासाठी धैर्य देतात. जे तुमच्यावर उपचार करतात ते डॉक्टर तुमचे देव. देवावर विश्वास ठेवा.

११) देव-दानव ह्या परस्परविरोधी आणि परस्परपुरक संकल्पना आहेत. आणि प्राचीन काळापासून सर्वच संस्कृतीत ह्यावर गहन चर्चा झाली आहे. देव न मानणारे कम्युनिस्ट खून बलात्कार करतात.

१२) जवळपास सर्वच देशात (संस्कृतीत) देव हि कल्पना आहे. झ्यूस अल्ला फॅरो निसर्ग इत्यादि

१३) देवांच्या रुपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुर्त्या व मौल्यवान वस्तुंच्या संरक्षणासाठी तसेच कुप्रवृत्तींच्या व्यक्तिकडून विटंबना होऊ नये ह्यासाठी बंदोबस्त असतो. रस्त्यावरच्या दगडाला देव मानतात तिथे पोलिस असतात?

१४) नवस करून काहीही मिळत नाही, कर्म अत्यावश्यक आहे.

१५) भ्रष्टाचार जागतिक समस्या आहे. प्राणीसुद्धा भ्रष्टाचार करतात.

१६) देव तुम्हाला धैर्य देतात, कर्म तुम्हालाच करायचे आहे.

१७) भिकारी हि मनोवृत्ती आहे. मानसिक दौर्बल्य असल्याने भिकारी होतात. ते आपण निवडणुकांमध्येसुद्धा पहातो. १ आठवडा राजकारणी जनतेकडे भीक मागतात, ५ वर्षे जनता राजकारण्यांकडे

तुम्ही प्रश्न विचारून स्वतः मधली विकृती भागवली. तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. निंदानालस्ती करून हिंदु धर्मातल्याना स्वतःच्या धर्मजातपंथ विचारधारेत ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कारण जे हिंदु देवळांच्या दानपेटीत जमा होणारा पैसा तुम्हाला तुमच्या प्रचारासाठी वापरता येईल. लक्षात घ्या, झारखंड असो वा केरळ सर्व आपत्तीत हिंदु देवस्थानांनी मदत केली. इतर लोक फक्त हिंदु देवळांच्या पेट्या उघडण्याची मागणी करत राहिले.

तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करण्यात जितका वेळ घालवता तितक्या वेळात तुम्ही कदाचित स्वतःचे आयुष्य सुधारू शकला असतात आणि इतरांचे जीवन सुंदर बनवू शकला असता. बुद्ध, अशोक, आंबेडकरांनी तसे केले म्हणून ते महान झाले. तुम्ही दुसऱ्यांची कृरुपता शोधताना स्वतःच्या मनातली घाण वाढवत रहाणार का?

काळा टिका, लिंबूमिरची, पूजा, बाबाबुवा, यज्ञ आणि मुहूर्त

काळा टिका : नजर लागू नये : काळ्या टिक्यामुळे सौंदर्यात बाधा येते , त्यामुळे कुकर्म करणाऱ्यांपासून संरक्षण होते

लिंबूमिरची प्रथमोपचारासाठी असतात. अपघात किंवा दुखापत झाल्यानंतर उपयोगी असतात.

पुजेस उपस्थित रहाणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने हाती घेतलेले कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सकारात्मक मानसिक बळ लाभते

बाबाबुवा हिंदु धर्मात नाहीत. किंबहुना बाबाबुवांकडे हिंदु देवतांची भ्रष्ट नक्कल असते.

कुंडली म्हणजे प्राचीन जेनेटिक्स. मिळत्याजुळत्या डीएनएचा संकर झाल्यास संततीमध्ये विकृती होते. कुंडली जुळणे म्हणजे

यज्ञात समर्पण वृत्ती महत्वाची असते , जी प्रत्येक कार्यात आवश्यक असते.

चिकित्सा म्हणजे आपल्याला असलेल्या माहितीचे तपासणी करून ज्ञानात रूपांतर करणे. ते तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये दिसत नाही.

- -

मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

ज्ञान हिंदु धर्म आणि अंधश्रद्धा

१)लिंबू मिरची औषधी असतात. प्रथमोपचारसाठी.
२)मांजराविषयक हिंदु धर्मात नकारात्मक काही नाही. जे आहे ते मांजरमुळे होऊ शकणाऱ्या रोगाविषयी आहे.
३) शिंक प्राणघातक असू शकते. कोणत्याही वैद्यकीय व्यक्तीकडून माहिती घ्या.
४) भूत म्हणजे आरोग्यास हानीकारक घटक. उदा पाणविंचू किटक किंवा साप
५) हिंदु धर्मात प्रत्येक घटनेत वैज्ञानिक मीमांसा आहे. तुम्ही चमत्कार पहाता ते टीव्हीमध्ये. वेद गीता किंवा प्राचीन धर्मसाहित्यात घटना आहेत, चमत्कार नाही.
६) बुवा बाबा प्रकार हिंदु धर्मात नाही. थोडा शोध घेतला तर उगम सापडेल.
७) करणी जादू टोणा प्रकार हिंदु धर्मात नाहीत. वेद गीता किंवा इतर साहित्यात हे प्रकार नाही.
८) वास्तूशास्त्र म्हणजे हवा पाणी उजेड ह्या घटकांच्या आधारे वास्तू उभारणी. हे संपूर्णपणे वैज्ञानिक आहे.
९) नवस म्हणजे कार्य करताना श्रद्धास्थानी केलेले दान. कर्मण्येवाधिकारस्ते सांगणारा हिंदु धर्म. लाच हा प्रकारच नाही.
१०) अंधश्रद्धा म्हणजे माहिती नसताना मेसेज करणे.

मुहूर्त : का आणि कोणासाठी. महत्व फायदे तोटे काय ?
मुहूर्त म्हणजे खगोलशास्त्रावर आधारित गणित.
खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांच्या हालचालीची नोंद व अनुमान. ग्रहांच्या हालचालीमुळे पृथ्वीवर हवा (वातावरण), पाणी (समुद्र भरती ओहोटी, नदी प्रवाह, पाणवठे) , उजेड (सुर्यप्रकाश) ह्यांच्यात बदल घडुन येतो.

शुभमुहूर्तावर काय होते?

वायूमंडळ प्रदूषण रहित असते.
ऑक्सिजन व जीवनास आवश्यक वायुंचे प्रमाण सर्वोत्तम असते.
पाणी स्वच्छ व स्थिर असते. भरती ओहोटी किंवा नजीकच्या पाण्याच्या प्रवाहाने माणसाची मनोवृत्ती बदलु शकते हे आता सिद्ध झाले आहे.
उजेड उत्तम असतो. हवा स्वच्छ असल्याने व तीव्र उजेड नसल्याने दृष्टीस त्रास नसतो.

शुभमुहूर्तावर कार्य केल्यास
मनुष्याचे मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असते, सभोवताली वातावरण स्थिर आल्हाददायक असते.

अर्थात शहर किंवा मानवनिर्मित प्रदूषण असलेल्या ठिकाणी शुभमुहूर्त योग्य फल देउ शकण्याची शक्यता कमी होते.

=============

सर्वांनी मुहूर्त पाहिले, पण एकालाच यश मिळाले म्हणून मुहूर्त खोटे मानायचे?
मुहूर्त हे परीश्रमाच्या झाडाला घातलेले खत आहे. आळशी मनुष्यास मुहूर्त लाभदायक कसे होणार ?

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी शिकत आहेत. त्या ५० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आणि पुस्तक असते तरी सगळेच पहिले येत नाहीत. मेहनत करणारेच पुढे येतात.

लाखो लग्न मुहूर्तावर होतात, काही तुटतात ती तामसी वृत्तीमुळे, काही परीस्थितीमुळे. पत्रिका जुळवुन केलेली लग्न तुटतात त्यामागे शास्त्राचे अपयश नाही, माणसाच्या स्वभावाचा दोष असतो.

हिंदु धर्मात कर्म हे महत्वाचे आहे. जे कर्म करतात त्यांनाच फळ मिळते. फळाची अपेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करणारेच विजेते होतात.

हिंदु धर्म संस्कृतीत प्रत्येक वस्तु किंवा घटनेसाठी शास्त्र आहे.

पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या वास्तुत माणसच पापकर्माने रहात असतील तर शास्त्राचा दोष नाही.

दुसऱ्यांची फसवणूक लुबाडणुक करणाऱ्यानी कितीही केले तरी पापाची किम्मत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागते. पैसा असेल तर आरोग्य नसते , आरोग्य असेल तर, मनशांती नसते.

शेवटी शास्त्र हे आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर आधारित आहे. ह्यामागे हजारो वर्षांचा अनुभव आहे. लाखो करोडोंमध्ये काही उदाहरण असतील ज्यात शास्त्र अपयशी दिसते, त्यामागे शास्त्रीय ठोकताळे चुकल्यामुळेच अपयश आल्याचे दिसुन येते.

मुहुर्तांच्या बाबतीत पेशवाई आणि ब्रिटीशांचे उदाहरण दिले जाते.
पेशवाई फितुरीमुळे लयास गेली, हे अपयश सर्वांचे होते. मुहूर्त पहाणारे  ब्राम्हण सेनापती होते म्हणून बुडाले स्वराज्य ? मग ह्याच मुहूर्त पहाणाऱ्यांकडुन मुघल शहा पोर्तुगीज डच ब्रिटीश का पराभुत झाले.
शेवटी ब्रिटीश साम्राज्याचा सुर्य ह्याच देशात बुडाला.

मुहूर्त सर्वच पहातात.

पाश्चिमात्य ( अमेरिका-युरोपीय) देश सभोवतालची परीस्थिती पहातात, जिथे जायचे आहे तिथली परिस्थिती पहातात, तिथला उजेड हवा पाण्याचा अंदाज घेउन जातात.

पाप करायला जातात म्हणून त्यांना अमावस्येचा अंधार लागतो. शेवटी पापाने मिळवलेल्या जमिनीची किम्मत त्यांना मोजावीच लागते. ( ज्यांनी लबाडी करुन प्रतिष्ठा कमावली आहे अशा लोकांना विचारा त्यांनी कोणते मुहूर्त पाहिले होते लपुन छपुन काम करायला)

हिंदु संस्कृतीत शुभकार्यासाठी मुहूर्त पहातात त्यासाठी खगोलशास्त्र वापरुन वेळ पहातात म्हणून हिंदु मागास नाहीत. फारफार परंपरावादी म्हणा.

 आपण मुहुर्त पाहतो, म्हणजे आपल्या आणि आपल्या सुहृदांच्या आरोग्याची काळजी करतो, ते सुद्धा वैज्ञानिक पध्दतीने!!

हिंदु धर्म संस्कृती विज्ञान तत्वज्ञान


एक मेसेज फिरतो आहे त्यात डार्विनच्या साक्षीने हिंदु धर्मावर घाण उडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे

डार्विनचा सिद्धांत वाचा मग अकलेचे तारे तोडा.
माकड व मानव ह्यांचा पुर्वज एकच आहे. माकडापासुन माणुस झाला नाही. एका प्राण्यापासून माणुस व माकड वेगवेगळे उत्क्रांत झाले.

आदिमानव अंगावर वल्कले घालायचा. हिंदु संस्कृतीनुसार देव म्हणजे नैसर्गिक तत्व. ज्यांना कालांतराने मानवी प्रतिमेत पाहिले गेले. म्हणून देवांच्या चित्र किंवा मुर्तींवर कपडे व अलंकार असतात.

माणसाने देव निर्माण केला नाही. मानवी आकलनाच्या आधीपासून जी तत्व अस्तित्वात आहेत त्यांना देव मानण्यात आले.

रामायण महाभारत सुमारे ५ ते ८ हजार वर्षे प्राचीन आहे. म्हणजे जवळपास ४०० पिढ्या. त्याच्याही आधीपासून धातुयुग अस्तित्वात आहे.

चाकाचा शोध इसवीसनाच्या आधीपासून लागला आहे. ब्रॉंझ युग म्हणजे १२००० वर्षांपासून चाकांचा वापर होतो आहे. मग ८००० वर्षांपुर्वी हिंदु संस्कृती रथ वापरत होती हे सत्यच आहे. पण हिंदुद्वेष्ट्या मुर्खांना ते माहिती नाही.

वानर हे गण होते , त्यांनी वानर हे प्रतिक स्वीकारले होते. ती माकड नव्हती. पाण्यावर तरंगणारे दगड ज्वालामुखीच्या परीसरात असतात. मूळ रामायणानुसार श्री राम उच्चारण करुन दगड पाण्यात ठेवले गेले. लिहिण्याचा उल्लेख नंतर भाषांतरीत रामायणात जोडला गेला.

हनुमंताने द्रोणागिरी पर्वतावरील शक्य तेवढे सर्व वनौषधी आणले. म्हणून द्रोणागिरी पर्वत आणला हे रुपक प्रचलित झाले.

वानर गण हे जलद प्रवास करणारे होते. त्यांना त्रास होण्याचे कारण नव्हते.

स्त्रीबीज पुरूषबीज एकत्र आल्याशिवाय जन्म होत नाही ह्याच्यासारखा वैज्ञानिक अडाणीपणा नाही. सर्वप्रथम जीव हे एकपेशीय होते. तिथे स्त्रीपुरुष बीज अस्तित्वात नव्हते.

सर्वप्रथम जीव हा पुरुष म्हणजे आदिम किंवा प्रथम ह्या अर्थाने आहे.

ब्रम्ह हा प्रथम जीव असल्याने तर सर्वच त्यांचे संतती होतात.

नाती नंतर जोडण्यात आली. वैज्ञानिक दृष्ट्या सर्वचजण एकमेकांचे भाऊबहिण होऊ शकतात. कारण मानवी उत्पत्ती एकाच जीवातुन झाली आहे.

हिंदु संस्कृतीतील दशावतार हे मानवी उत्क्रांतीचे प्रतीक आहेत. सप्तफण्यांवर असलेली पृथ्वी म्हणजे टेक्टोनिक प्लॅट्सवर असलेले भूखंड. राहुकेतु म्हणजे चंद्रसुर्यांच्या परीक्रमेचे छेदनबिंदू.

आर्यभटाने शुन्याचा वापर सुरु केला. अंक गणना किमान १२ ते १५ हजार वर्षापासून होते आहे.

आदिमानवाला जातधर्म नव्हते कारण जात धर्म हि संकल्पना मानवी उत्क्रांतीबरोबर विकसित झाली.

जाती पंथ सर्वच धर्मात आहेत. इस्लाममध्ये शिया सुन्नी वहाबी, ख्रिश्चनधर्मात ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथलिक प्रोटेस्टंट सिरेनिटीक लॅटिन , बौद्धधर्मात हीनयान महायान थेरवाद आहेत. किंबहुना नास्तिकातही अगम्यावर विश्वास ठेवणारे आहेत. विख्यात शास्त्रज्ञही विश्वाच्या उत्पत्तीविषयी साशंक आहेत.

स्त्री हा हिंदु संस्कृतीचा मानबिंदु आहे. स्त्रियांना पूजाविधी अध्ययन अधिकार आहे. हिंदु संस्कृतीत स्त्री ही आदिशक्ती आहे. अनेक हिंदु मंदिरात स्त्रीया पुजा व धर्मविधी करतात. हिंदु धर्मस्थळातील गाभाऱ्यात स्त्रीया स्वच्छतेच्या कारणाने मासिक पाळीचा अपवाद वगळता जाऊ शकतात. इतर धर्मात जिथे सर्वोच्च धार्मिक प्रतिमा आहे तिथे स्त्रीयांना प्रवेश नाही.

दोन सहस्त्रकांच्या ज्ञात धार्मिक इतिहासात कोणत्या धर्मात्या स्त्री धर्मप्रमुख होती? हिंदु संस्कृतीत स्त्री धर्मगुरू बनु शकते. त्यासाठी न्यायालयातुन कायदा होऊ शकतो. इतर धर्मात असे शक्य आहे?

हिंदु संस्कृती प्रथम संस्कृती आहे ज्यात पृथ्वी व सुर्याचे भ्रमण मान्य आहे. पृथ्वी हा ग्रह , सुर्य हा तारा ब्रम्हांडात इतर ताऱ्याभोवती फिरत आहेत हे सांगितले आहे. हिंदु संस्कृतीत खगोल अवकाश रसायन जीव औषध वनस्पती भौतिक धातु भाषा असे अनेक प्रकारचे शास्त्र आहेत.

विदेशी आक्रमकांनी नालंदा विश्वविद्यापीठ जाळुन टाकण्याआधी हिंदु संस्कृतीत सर्व ज्ञानाचा समावेश होता. म्हणून जगभरच्या संस्कृतीना इथे येऊन व्यापार करायचा होता. इथे दैन्य गरिबी हिंसा असती तर  मुघल इंग्रज डच फ्रेंच आक्रमक इथे स्थिरावले नसते. किंबहुना इथली संपत्ती जहाजे भरुन युरोपात नेण्यात आली.

आजही पृथ्वी सपाट व विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ग्रंथांच्या धर्मांवर तुम्ही टीका करु शकत नाहीत कारण तिथे तुमचे समुळ उच्चाटन करण्यात येते.

विज्ञान तत्त्वज्ञान ह्यांचा सुरेख संगम असलेल्या हिंदु संस्कृतीत परकीय आक्रमकांनी अनिष्ट रीतींचा समावेश केला असेलही. पण त्याचप्रमाणे अशा अनिष्ट रीतींचा कालानुरूप त्यागही हिंदु संस्कृतीने केला आहे.

हिंदु संस्कृती तुम्ही सर्वश्रेष्ठ मानत नसाल तर त्यात हिंदु संस्कृतीचा कमीपणा नाही, त्यात तुमचा अडाणीपणा आहे.

गरज , खेडी, विकास


ज्या समस्या आहेत, त्यावर राजकारणी उपाय शोधणार नाहीत.. कारण प्रश्न सहज सुटले तर निवडणुका घ्यायची गरज उरणार नाही..

आपण छोट्या व्यापाऱ्यांकडुन वस्तु विकत घेण्याचा प्रयत्न करतो , पण किती व्यापारी साठेबाजी नफेखोरी न करता सचोटीने धंदा करतात ?

पेट्रोल-डिझेल गाड्या विमान ह्या आपण निर्माण केलेल्या गरजा आहेत.. पुर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या, म्हणून खर्च कमी होता .. आता जाहिराती करुन चैनीच्या गोष्टीचे  गरजेत रूपांतर केले गेले आहे, म्हणून मागणी वाढत गेली त्याप्रमाणात त्या वस्तु आणि सेवेची किम्मत वाढवण्यात आली..

महाराष्ट्रतले दारु कोल्ड्रिंक सिगारेट तंबाखू आणि फास्टफुड चे कारखाने बंद केले तर दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा होणार नाही.
शहरातली लोक हे मान्य करणार का ?

गावाशहरात रोजगार आणि सरकारी कार्यालय (जिथे गेल्यावर जिल्हा मुख्यालय किंवा मंत्रालयात जायची गरज भासु नये) उपलब्ध असते तर प्रवास कमी झाला असता आणि पेट्रोलडीझेलची गरज कमी झाली असती. पण हे जाणीवपूर्वक टाळले जाते.

युरोपीय सत्ता येण्या आधी खेडी स्वयंपूर्ण होती , औद्योगिकिकरण होण्याआधी प्रदूषण नव्हते, हरीतक्रांती दुग्धक्रांती होण्याआधी डायबेटिस कॅन्सरचे इतके रुग्ण नव्हते.

विकासाच्या नावाखाली खेड्यांचे शहरीकरण करण्यात आले , आणि सर्वच तोल सुटला.. अनिर्बंध विकास करताना निसर्गाचा आणि भविष्यातील परीणामांचा अभ्यास झाला नाही. मोठमोठे रहिवासी प्रकल्प बांधताना त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांची तजवीज झाली नाही. प्रगत देशातले हानीकारक उद्योगाना भारतात परवाना देताना इथल्या सुपीक भुमीचा पाण्याचा हवेचा विचार केला गेला नाही.

सामान्य माणुसाला लहानपणापासूनच श्रीमंताकडे नोकरी करण्यासाठी शिक्षण देण्यात येते.. ज्यांना त्रास होतो ते थोडाफार विरोध करतात, काही मोर्चे काढतात तर काही लेखणी , उरलेले गुलामीत सुख शोधण्याला प्रगती म्हणतात.. पिढ्यानपिढ्या हि गुलामी सुरु रहाणार आहे, त्याला राजेशाही लोकशाही कम्युनिझम समाजवाद भांडवलशाही ह्यातल्या कोणत्याही प्रकाराने फरक पडणार नाही.

बदल घडवुन आणायचा असेल तर तक्रार करायचे बंद करा. शासनव्यवस्था कशी कार्य करते , आपला ज्या व्यक्ती समुहाशी संबंध येतो ते कोणत्या प्रकारचे वस्तु किंवा सेवा घेतात,  त्यांचे  दोन किंवा जास्त व्यक्ती किंव समुह ह्यांचे व्यवहार कसे होतात, गरज मागणी पुरवठा ह्यांचा अभ्यास करा.  अतिरिक्त उपलब्ध असलेली चैनीची वस्तु किंवा सेवा गरज म्हणून कशी द्यावी व त्याचा जास्तीतजास्त जास्त मोबदला कसा घ्यावा हे ज्यांना जमणार आहे तेच सर्वात पुढे असणार  आहेत.

हिंदु सणांनिमित्ताने

श्रावणी सोमवार जवळ येत आहेत तसे महादेव श्री शंकराच्या पिंडीवर दुध पाण्याचा अभिषेक करण्याबद्दल टीका करणारे महाभाग जन्माला येत आहेत. गरीब अनाथ भुकेलेल्यांना हे दुध आणि पाणी का देत नाहीत , तुमचा धर्म माणूसकीच नाही म्हणे..

सर्वधर्मसमभावचा टाहो फोडणारे हे निधर्मी शहाणे पंढरीच्या वारीत दंग होत नाहीत.  पण रमदान आणि इदला टोपी चढवुन मिठ्या मारत होते. एकमेकांना भरवुन उपवास सोडत होते. मशिदीत वजु करताना पाणी वापरले जाते हे कसे विसरता ? चर्चमध्ये वेफर्स आणि वाईन बनवताना पाणी वापरले जात नाही? लवकरच ख्रिसमस येईल तेव्हा केक आणि इतर वस्तुंची देवाणघेवाण होईल. पण कोणताही हिंदु त्याविषयी तक्रार करत नाही, हिंदु सामील होतात सर्व सणात.. सत्यनारायण पुजेचा प्रसाद इतर धर्मीय खायला धजावत नाहीत. हिंदुना चर्चमधे पवित्र प्रसाद दिला जातो का ? कारण तो धर्मावर असलेल्या श्रद्धेचा भाग आहे. तिथे कोणी प्रश्न विचारायला जात नाहीत. सहिष्णुता आणि व्यापकता हा हिंदुत्वाचा स्थायीभाव आहे.

शेतकरी (?) रस्त्यावर भाज्या दुध ओतत होते तेव्हा नाही का आठवण झाली गरीब भुकेल्या अनाथांची ? तेव्हा  शेतकऱ्यांच्या बाजुने तावातावाने भांडत होते. कोणी जाऊन विचारलय का खऱ्या शेतकऱ्यांना कि बाबारे तुला कर्ज देतो कोण आणि तुला लुटतो कोण ?

शहरात बर्गर पिझ्झा पेप्सी कोकवर जगणारे काय आणि गावाकडे साहेबांच्या हुकुमाची बजावणी करणारे काय.. दोघे सारखेच तुटुन पडतात हिंदु सणांवर..

पिझ्झा बर्गर केक सिगारेट दारू ह्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो पण हे हिंदु धर्माचा भाग नसल्याने त्यावर टीका नाही..


हिंदु सणांनिमित्ताने छोट्या दुकानदार शेतकरी दुधवाले (गवळी नाही लिहित, मुंबईत फोन फिरायचे) ह्यांना रोजगार मिळतो.. गावातुन उत्साह वाढतो.  हे दुध किंवा पाणी सरकारी खर्चाने वाया घालवत नाहीत. सरकारी खर्च म्हणजे आम्ही भरलेला कर. तुम्ही करमाफी होण्यासाठी CA कडे पैसे चेपता.
श्री शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणाऱ्यांमुळे जितके दुध वापरले जाते त्याचा फायदा दुध उत्पादक आणि विक्रेत्यांना होतो. रस्त्यावर दुध ओतुन त्याचा फायदा कोणाला होतो?

धर्म म्हणा किंवा व्यापार म्हणा, तिथे भेदभाव करु नका. तुम्हाला करायची असेल बचत तर फास्टफुड दारु तंबाखू पदार्थ बंद करुन बचत करा पण तुम्हाला ते झेपणारे नाही.

तुमचे पुरोगामी बुडबुडे हिंदु सणांच्या वेळीच येतात हे आता सर्वांना माहिती आहे. हेच कारण आहे कि तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत कारण तुम्ही परकीय व्यापारी प्रवृतींच्या तालावर नाचत आहात आणि त्यात तुमचा अध:पातही होतो आहे.