हिंदु सणांनिमित्ताने

श्रावणी सोमवार जवळ येत आहेत तसे महादेव श्री शंकराच्या पिंडीवर दुध पाण्याचा अभिषेक करण्याबद्दल टीका करणारे महाभाग जन्माला येत आहेत. गरीब अनाथ भुकेलेल्यांना हे दुध आणि पाणी का देत नाहीत , तुमचा धर्म माणूसकीच नाही म्हणे..

सर्वधर्मसमभावचा टाहो फोडणारे हे निधर्मी शहाणे पंढरीच्या वारीत दंग होत नाहीत.  पण रमदान आणि इदला टोपी चढवुन मिठ्या मारत होते. एकमेकांना भरवुन उपवास सोडत होते. मशिदीत वजु करताना पाणी वापरले जाते हे कसे विसरता ? चर्चमध्ये वेफर्स आणि वाईन बनवताना पाणी वापरले जात नाही? लवकरच ख्रिसमस येईल तेव्हा केक आणि इतर वस्तुंची देवाणघेवाण होईल. पण कोणताही हिंदु त्याविषयी तक्रार करत नाही, हिंदु सामील होतात सर्व सणात.. सत्यनारायण पुजेचा प्रसाद इतर धर्मीय खायला धजावत नाहीत. हिंदुना चर्चमधे पवित्र प्रसाद दिला जातो का ? कारण तो धर्मावर असलेल्या श्रद्धेचा भाग आहे. तिथे कोणी प्रश्न विचारायला जात नाहीत. सहिष्णुता आणि व्यापकता हा हिंदुत्वाचा स्थायीभाव आहे.

शेतकरी (?) रस्त्यावर भाज्या दुध ओतत होते तेव्हा नाही का आठवण झाली गरीब भुकेल्या अनाथांची ? तेव्हा  शेतकऱ्यांच्या बाजुने तावातावाने भांडत होते. कोणी जाऊन विचारलय का खऱ्या शेतकऱ्यांना कि बाबारे तुला कर्ज देतो कोण आणि तुला लुटतो कोण ?

शहरात बर्गर पिझ्झा पेप्सी कोकवर जगणारे काय आणि गावाकडे साहेबांच्या हुकुमाची बजावणी करणारे काय.. दोघे सारखेच तुटुन पडतात हिंदु सणांवर..

पिझ्झा बर्गर केक सिगारेट दारू ह्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो पण हे हिंदु धर्माचा भाग नसल्याने त्यावर टीका नाही..


हिंदु सणांनिमित्ताने छोट्या दुकानदार शेतकरी दुधवाले (गवळी नाही लिहित, मुंबईत फोन फिरायचे) ह्यांना रोजगार मिळतो.. गावातुन उत्साह वाढतो.  हे दुध किंवा पाणी सरकारी खर्चाने वाया घालवत नाहीत. सरकारी खर्च म्हणजे आम्ही भरलेला कर. तुम्ही करमाफी होण्यासाठी CA कडे पैसे चेपता.
श्री शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणाऱ्यांमुळे जितके दुध वापरले जाते त्याचा फायदा दुध उत्पादक आणि विक्रेत्यांना होतो. रस्त्यावर दुध ओतुन त्याचा फायदा कोणाला होतो?

धर्म म्हणा किंवा व्यापार म्हणा, तिथे भेदभाव करु नका. तुम्हाला करायची असेल बचत तर फास्टफुड दारु तंबाखू पदार्थ बंद करुन बचत करा पण तुम्हाला ते झेपणारे नाही.

तुमचे पुरोगामी बुडबुडे हिंदु सणांच्या वेळीच येतात हे आता सर्वांना माहिती आहे. हेच कारण आहे कि तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत कारण तुम्ही परकीय व्यापारी प्रवृतींच्या तालावर नाचत आहात आणि त्यात तुमचा अध:पातही होतो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा