धर्म का कशासाठी ?

💭 शनिच्या दगडावर महागडे लाखो लिटर तेल वाया जरी गेले तरी चालेल; पण हातावरचा चिमुटभर प्रसादाचा कण सुध्दा जमिनीवर पडला नाही पाहिजे...
🚩 : भाविक स्वतःच्या श्रद्धेने स्वतःच्या खर्चाने तेल वाहतात. त्याने त्यांना मानसिक उभारी येते. जगण्याची ताकद वाढते. तेल विकणारे व इतर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना चालना मिळते.
✋🏼इतर धर्मिय मेणबत्त्या किंवा काहीतरी लावतातच त्यांनी स्वतःपासुन सुरुवात करावी. नास्तिकांनी पेट्रोल डिझेल वीजेचा वापर करणारी वहाने वापरु नये. तेलापेक्षा जास्त महाग आहेत हे प्रकार.
💭 दलित आदिवासींची मुलं अन्न पाणी व  दुधावाचून कुपोषणाने मेली तरी चालतील; पण शंकराच्या दगडी पिंडींला लाखो लिटर दूधाने आंघोळ घालून धुतलेच पाहिजे..
✋🏼 दलित आदिवासी धर्म बदलुन मागास कसे राहिले ? कोणी काढल्या धर्मांतरासाठी मोहिमा ?
✋🏼  उपदेश करणाऱ्यांनी स्वतःच्या जेवणातले दोन घास बाजुला काढुन मग सांगावे. स्वतःच्या धर्मातल्या सणांमध्ये पार्ट्या नसतात का ?
✋🏼 नास्तिकांनी आपली व्यसने सोडुन उपदेश करावे.
💭 रेशनवर गरिबांना तांदूळ नाही मिळाले तरी चालतील; पण लग्न कार्यामध्ये अक्षता म्हणून हजारो टन तांदूळ उधळलेच पाहिजे.
✋🏼 एका हिंदु लग्नात  लग्नात जास्तीतजास्त ४-५ किलो तांदूळ अक्षतेसाठी वापरला जातो. म्हणजे १२० ते १६० रुपये. बाकिच्यांनी  आपल्या लग्नातल्या मांस आणि बाकि जेवणाचा खर्च ह्यावर विचार करावा.
💭 चपातीला तुप नसले तरी चालेल; पण गुजरात मधील मंदिरामध्ये पायाखाली लाखो लिटर घी तुडवलेच पाहिजे.
✋🏼 तुमच्या घरातले तुप काढुन नेत नाही. स्वतःच्या कष्टाने कमावलेले तुप आहे. तुम्ही गाय कापायला तयार असता , मग गायीपासुन मिळालेल्या तुपावर बोट दाखवु नका.
💭 मुलांच्या शाळेला फी भरायला पैसा नसला तरी चालेल; पण मंदिराच्या दानपेटी मार्फत ब्राह्मणांना करोडो रुपयांचा मलिदा महिन्याला  पोहोचलाच पाहिजे.
✋🏼 शाळांचा व्यवसाय करणारे धर्म कोणते आहेत हे स्वतःच तपासून बघावे. धार्मिक शाळांमध्ये फी न भरल्यास हाकलून देतात.
नोकरी व्यवसाय न करणारा फक्त मंदिरात पुजा करणारे श्रीमंत पुजारी कोणत्याही देवळात नाहीत. देवस्थानाचे व्यवस्थापक असतात. त्यांच्यावर सरकारी अधिकारी देखरेख ठेवतात आणि हिशोब सार्वजनिक होतात. बघा बाकि धर्म हिशोब देतात का.
💭 कुंभ मेळयात नागडया साधूंनी धुमाकूळ घातला तरी चालेल; पण आपल्या शिकलेल्या मुलींना, आया-बहिणी व सुनेला त्या नागडया साधूंचे आशिर्वाद मिळालेच पाहिजे.
✋🏼 आता बघा कि बाकि धर्मात लहान मुलांवर अत्याचार कोण करतात आणि ती प्रकरणे कशी लपवली जातात. तुमच्या लहान मुलांना विश्वासात घेउन विचारा कि धर्मगुरू काय करतात.
💭 हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल आया-बहिणीची ऊन्हातान्हात पायपीट झाली तरी चालेल; पण देवा धर्माच्या नावाखाली तलाव नद्या दूषित केलेच पाहिजेत.
✋🏼 प्रदूषण जगभर आहे. हिंदु अल्पसंख्यांक आहेत तिथल्या नद्या सर्वात जास्त प्रदूषित आहेत.
💭 शरीर अशक्त झाले तरी चालेल; पण दार आठवड्याचे उपवास केलेच पाहिजेत.
✋🏼 उपवासाने शरीर शुद्ध होते. विषारी घटक निघुन जातात. कुठल्याही चांगल्या डॉक्टरना विचारा.
💭 घराच्या चार भिंतीसाठी लाखाचे कर्ज काढले तरी चालेल; पण सुखशांतीसाठी सत्यनारायण घातलाच पाहिजे.
✋🏼 बघा कोणत्या धर्माची बांधकाम मोठी आहेत. सत्यनारायण पुजेत वेगवेगळ्या लोकांना रोजगार मिळतो.
💭 आया बहिणींची अब्रू लुटली गेली, हुंड्यासाठी छळ झाला तरी चालेल; पण आपण 'तिचे नशीबच फुटके' असे म्हणत शांत बसले पाहिजे.
✋🏼 अब्रू लुटणाऱ्या गुन्हेगारांचे नाव धर्म बघा. त्यांच्यावर कारवाई झाली कि अल्पसंख्याक खतरे मे.
💭 उच्च शिक्षण घेणारया व शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान झाले तरी चालेल; पण लग्न कार्यात तसेच सणासुदीला डिजे ढोल ताशे वाजलेच पाहिजेत.
✋🏼 डीजे संस्कृती कोणाची ? ढोलताशे डीजेपेक्षा सुसह्य आहेत.
💭 महाग खतबियाणं आणि पाणीपावसाला पारखा होऊन कर्जबाजारी झालेल्या  शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी चालेल; पण शेतकर्यांची सतत  फसवणूक करून पंचतारांकित हॉटेलात जेवणाऱ्या त्याच त्याच पक्ष नेत्यांना सतत निवडून दिलेच पाहिजे.
✋🏼 हे ७० वर्षे सुरु आहे. आणि हे नेते इतर धर्मांच्या कार्यक्रमांना तशा वेशभूषेत जातात. पण हिंदु वेशभूषा करत नाहीत.
💭 म्हातारे-कोतारे, आजारी-पाजारींना, तान्हया बाळांना आवाजाचा त्रास झाला तरी चालेल; पण दिवाळीत प्रदूषण वाढवणारे फटाके वाजलेच पाहिजेत.
✋🏼 फटाके संस्कृती कोणाची ? दिवाळीपेक्षा जास्त फटाके ३१ डिसेंबरला वाजतात. हिंदु संस्कृतीत दिवाळी म्हणजे अंधार दुर करणाऱ्या दिव्यांची आरास. त्यात मंगल वाद्ये आहेत. गोंगाट आणि कर्कश्शपणा नाही.
💭 ट्राफिक जाम होऊन देशाचे नुकसान झाले तरी चालेल; पण करोडो रुपयाची उधळण करणारे गणेशोत्सवाचे मांडव रस्त्यावर लागलेच पाहिजेत. गरबाही झालाच पाहिजे.
✋🏼 रस्त्यावर गणेशोत्सव मांडव आठवडाभर असतात. त्यातही आता घट होते आहे. बाकी धर्म वर्षभर रस्त्यावर प्रार्थना करतात.
💭 तरूण मुले विविध नशा करून बिघडली तरी चालेल; पण उत्सवी मिरवणुकीत व  निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत मुले नाचायला पाठवलीच पाहिजेत.
✋🏼 दारुची दुकाने कोणाची आहेत ? दारु पिणारे १ जानेवारीला सर्वात जास्त दिसुन येतात. दारुच्या सवयी कोणी लावल्या ? गेली ७० वर्षे दारु कोणी वाटली निवडणुकांमध्ये ?
💭 जातीपाती मध्ये विभाजित राहून एकमेकांचे जीव घेतले तरी चालेल; पण स्वार्थी नेत्यांपुढे व पाखंडी धर्ममार्तंडांपुढे झुकलेच पाहिजे.
✋🏼 सर्व धर्मात पंथ आहेत. आणि धर्मगुरूंचे एकमेकांशी वैर आहे. हिंदु धर्मात कोणत्याही जातीचा मनुष्य किंवा स्त्री देवळात पुजारी बनुन पवित्र स्थानी पुजा करु शकतो. इतर धर्मात स्त्रीयांना पवित्र स्थानी स्पर्श करायची परवानगी नाही. सर्वोच्च स्थानी आजपर्यंत स्त्री , कृष्णवर्णीय किंवा इतर रंगाच्या लोकांना स्थान नाही.
💭 केव्हा थांबणार हे ? बस झाली स्वत:चीच फसवणूक करून घेणे. अंधश्रद्धा बागळणे थांबवा. सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींनो, आपण विकृत प्रथांना तिलांजली दिलीच पाहिजे. सक्षम देश उभारणीसाठी आता प्राणपणाने लढा उभारलाच पाहिजे... लढा उभारलाच पाहिजे .
✋🏼 हिंदु धर्म हा विशाल संस्कृतीतुन आला आहे. जिथे इतर रीतीरीवाज स्विकारले जातात. अन्यायकारक रीतीरीवाजांवर चर्चा लढा होऊन ते रीवाज बंद होतात. बाकी धर्मात चर्चा करणे पाप आहे. हिंदु धर्मात वैज्ञानिक तत्वे जसे सुर्य पृथ्वी भ्रमण, टेक्टॉनिक प्लेट्स (सात फण्यांवरील पृष्ठभाग) अणु , रसायन भौतिक जीवशास्त्र ह्यांचा अभ्यास आहे.  बाकी धर्मात पृथ्वी स्थिर सपाट आणि विश्वाच्या केंद्रस्थानी आहे.
--
अंधश्रध्दा मुक्त परिवार , सुखी परिवार.
 ✋🏼
 अंधश्रद्धानिर्मूलनासाठी आम्ही देणग्या स्वीकारतो आणि हिंदु धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो मग कितीही धर्मांतर झाले तरी आम्ही त्या धर्माचे नाव घेत नाही. एकीकडे आम्हाला चमत्कार मान्य नाहीत म्हणून आम्ही हिंदु धर्मातील संतांवर आणि कथांवर टीका करतो, दुसरीकडे बाकी धर्मांच्या प्रमाणित ग्रंथांवर एक शब्द बोलत नाही.
-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा