शेतकरी आणि कर्ज मुक्ती

सर्व आजी माजी खासदार आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य , सहकारी कारखान्यांचे संचालक मंडळांची जाहिर चौकशी करा आणि बघा कर्ज मुक्ती होते कि नाही..
किमान निवडणुकीत जाहिर केलेली संपत्ती तरी बघा..
हजारो कोटींची संपत्ती घेउन कुठे जाणार हे लोक?
जवळपास सगळे सहकारी कारखाने आणि बॅंकांवर माननीय आणि अनुभवी नेते मंडळीच आहेत,
तरी पण वर्षानुवर्षे तोट्यात कसे !!!
शेतकर्यांपर्यंत कर्जमाफी पोहचतच नाही,
मदत आजारी कारखाने आणि बॅंका गिळंकृत करतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात. असे वाचले आहे.
सत्य काय ते साहेबाना ठाउक!!
पण खिशात दमडी नसणारे नेते
आज शेकडो हजारो करोडचे मालक कसे झाले
ते जनतेला ठाऊक आहे!!
शेवटी शेतकर्यांची काळजी फक्त विरोधी पक्षालाच!!

निधर्मी, अधर्मी या परधर्मी

धर्म आपके गुरु समान है.
निधर्मी, अधर्मी या परधर्मी
आपके दोस्त बंधु सखा हो सकते है,
कठिण समय मे आपकी सहायता कर सकते है,
लेकिन धर्म आपका धर्म
आपको अंदरसे मजबुत बनाता है.
यदी आपका सह धर्मी कमजोर पडे,
तो उनकी मदद किजीये, इससे धर्म बढेगा.
सिर्फ धार्मिक कार्य करके हम आगे नही जा सकते,
हमे आर्थिक और व्यावहारीक सहकार्य करना होगा.
जबतक हम धर्म मे उच्च नीच्चता रखेंगे,
हम खुदके धर्म बांधवो को
दुसरे धर्म मे प्रवेश करने मे मजबुर करेंगे,
समानता ना हि सही, कम से कम सहायता किजीये.
धर्म जताइये, धर्म बढाइये.
अभिमान मे चाहे धर्म को ना रखे
लेकिन धर्म का अभिमान किजीये.
कोई धर्म का अपमान करे,
तो धर्म का अहंकार भी किजीये.

धर्म : निधर्मी, अधर्मी आणि परधर्मी

मुसलमानांशी किंवा इतर धर्मियांशी भांडुन
काय सिद्ध होणार?
प्रत्येक धर्मात त्यांच्या पापाची शिक्षा
लिहिली गेली आहे ना?

स्वत:च्या धर्माची नाचक्की करणार्या
अधर्मी हिंदुपेक्षा राष्ट्रीय परधर्मी बरा!!

धर्मानंतर तुमचा देश तुमची रक्षा करतो.
फार पुर्वी पासुन देश हे धर्म ह्या घटकाने बांधले गेले आहेत.

शस्त्र व धर्म घेउन यवन आले,
त्यानी बळजबरीने इस्लाम लादला.
त्यानंतर हातात धर्म व तराजु घेउन
इंग्रज आणि पोर्तुगीज आले,
त्यानी लबाडी आणि फितुरीने त्यांचा धर्म लादला.
त्याच जोरावर त्यानी कारकुन गुलाम तयार करुन राज्य केले.

देश सोडताना त्यानी हिंदु-मुसलमानात कलह लावुन दिला,
सहिष्णु राष्ट्रपित्याला सुद्दा दंगेखोराना आवरता आले नाही,
स्वत:च्या देशासाठी लढणार्या सुभाषचंद्रांसारख्या सेनानीपेक्षा त्यानी इंग्रजांची बाजु घेतली..

फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानानी हिंदुंच्या निशस्त्र स्त्री पुरुष लहान मुलांवर जे अत्याचार केले त्याना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यानी पाठिशी घातले.

तेव्हा पासुन कॉंग्रेस व सहकारी फक्त मुसलमानांच्या बाजुने असल्याचे चित्र आहे. पण कॉंग्रेस निधर्मी.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने हिंदुना पाठिंबा दिला तर ते अतिरेकी हिंदुत्ववादी?

आज सुद्धा समाजात आणि देशात फुट पडली आहे,
विघातक कारवाया होत आहेत,
त्याला धर्म जबाबदार की नेते?

म्हणुन,
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा.
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

शांत जीवन कि धर्म?

जनता कट्टर धर्मांधाना घाबरते,
सामान्य मुस्लिमाना नाही,
मेणबत्त्या घेउन मोर्चे काढले
म्हणजे शांतीप्रियता होते का?

इतर धर्मांवर सामजिक व आर्थिक वर्चस्व,
तसेच धर्मांतरास प्रोत्साहन देणे हा दहशतवाद नाही?

एक धर्म तुमची माणसे मारुन कमी करतो,
दुसरा न मारता तुमची माणसे कमी करतो.

तुम्हाला काय हवे आहे?
शांत जीवन कि धर्म?
जरी शांत जीवनासाठी
तुम्ही धर्म बदलला तरी
तुम्ही बाहेरचेच रहाणार.

म्हणुन
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब यांचे चरणी..

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

प्रती,
माननीय आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब,

२३ जुलै आणि १ ऑगस्ट हे पुण्यदिन. 

दिन असं लिहिलं कारण तीथी भारतीय आहे. दिन इंग्रजी आणि मॉडर्न आहे
आम्ही सुट्ट्यांपुरता भारतीय असतो. बाकी वेळ इंग्रजी कालगणना सोयीची असते.

प्रात:स्मरणीय लिहिणार होतो , पण रात्री सुरु होऊन प्रात:कालापर्यंत चालणार्या मद्यप्रश्नाला सामाजिक मान्यता आहे. तेव्हा प्रात:कालीन सामाजिक परिस्थिती बाकी प्रहाराप्रमाणेच असते.

तुम्हाला साहेब उपाधी लावल्याबद्द्ल क्षमस्व. तुम्हाला स्वर्गवासी (तुम्ही तरी स्वर्गातच जाल) होऊन 95 वर्षे झाली, इंग्रज जाऊन 68 वर्षे उलटतील. पण जनतेवरच उलटलेल्या नेत्यानी साहेब हि उपाधी प्रतिष्ठेची केली आहे. तेव्हा तुम्ही आमची मानसिक आर्थिक सामाजिक शासकिय आणि राजकिय गुलामगिरी समजुन घ्याल हि अपेक्षा.बघा गुलामीची सवय जातच नाही, आमच्या अपेक्षा संपतच नाहीत, त्यामुळेच देशाला भीकाऱ्यांचा देश म्हणतात का?

देश म्हणजे आसिंधु-सिंधु नाही हो. तुम्ही गेल्यावर तुमचे छायाचित्र टांगवणाऱ्या (सध्या ते ही फक्त जन्मदिन आणि पुण्यदिना पुरता दिसतात) तुमच्या नावाने पक्ष चालवणार्यानी इंग्रज आणि मुस्लिम लीगच्या कृपेने तोडुन मोडुन मिळवला ( तरी पोर्तुगीजानी दिलाच नाही, काही हजार लोक धारातीर्थी पडल्यावर निधर्मी सरकारने गोवा मुक्त केला.) बघा देश स्वतंत्र होतानाच विभक्त करुन मिळवला.. अहो 8x10 च्या खोली करता भांडणार्या सामान्य जनतेला हक्काच्या देशाची आस होती, जमिनीची किम्मत होती त्यानी बलिदान केल. महालात रहाणाऱ्यानी मिळेल तेवढा देश स्विकारला.. 150 वर्षांचा लढा 15 वर्षांच्या वाटाघाटीत (धंद्याची भाषा बोलायची तर घाटाच) संपवुन टाकला. माणस छोट्यश्या खोली साठी आयुष्यभर लढा देतात, पण उतावळ्या नेत्याना सत्तेच बाशिंग बांधायची घाई झाली..

असो. स्वातंत्र्यानंतर ताळतंत्र सोडुन लोक वागु लागले. संस्कार मर्यादा समाज सन्मान लाज निर्भयता सभ्यता ह्यांच्या व्याख्याच बदलल्या.

गेल्या 95 वर्षात विश्वास बसणार नाही असे शोध लागले. पण माणसाचा माणसावर विश्वास बसत नाही. माणुस माणसावर विश्वास ठेवत नाही पण कागदांच्या तुकड्यांवर ठेवतो. अर्थात हे गीतेत सांगितल आहेच.

तुम्ही गेल्यावर परीस्थिती तशीच राहिली. फार पुर्वी स्वकियांची गुलामी केली , नंतर मधल्या हजारो वर्षात परकियांची गुलामी केली, आता परकीय मानसिकतेच्या स्वकियांची गुलामी करतो आहोत.

तुम्ही विचारल खडसावुन कि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय..
आता अस विचारणाऱ्याचाच ठावठिकाणा लागत नाही.
लोकशाही ही ठोकशाही बनली आहे.
राजकारण्याना **गना (***stitues) ,
रक्षकाना रक्षांगना (polistutes) ,
पत्रकाराना पत्रांगना (prestitutes) बोलतात ,
पण बोलणार्याची जीभ हासडण्याचा अधिकार असलेले तुमच्या सारखे कधीच राजकारण आणि पत्रकारितेला पोरक करुन गेले आहेत.

पुर्वी घोटाळ्यात नाव आल तर नेते आणि जनता तोंड लपवायची,
आता पत्रकार परिषदा घेतात आणि निवडणुकीच्या तयारीला लागतात
राजकारणाच्या गजकरणावर निवडून येण्याचा मलम शोधल्यावर सर्वच गोष्टी पवित्र झाल्या.

तुम्ही गेल्यावर तुमच्या नावाने जो टिळक फंड सुरु झाला होता त्यानेच सुरुवात झाली,
कि इंग्रजानी शिकवल ते त्यानाच माहिती,
पण पापाची प्रसिद्धी मिळवुन माणस थोरपदाला पोहचली.

जनतेला सरकारची कामगिरी विचारली तर "भ्रष्टाचार" सोडुन दुसर काही ऐकायला मिळण्याची अपेक्षाच नाही.
विरोधी पक्ष फक्त विरोध आणि पुढच्या निवडणुकीच्या प्रचारापुरताच उरला आहे.

लवकरच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी सुरु होईल. पण देशात समाजात विद्वेशाच विष भिनल आहे.

मवाळ आता टवाळ झाले
जहाल तर मस्तवाल झाले.

सरकारी निधींच्या शेंगा खाऊन पुराव्यांच्या टरफलांचे राजकारण करणाऱ्यांकडून साष्टांग नमस्कार.

वॅलेंटाईन डे आठवडाभर सेलिब्रेट करण्याच्या हक्कासाठी भांडणाऱ्या पिढी आणि पाठिराख्यांच्या वतीने तुम्हाला पुण्यदिनाच्या शुभेच्छा.

ता.क. सर्व भ्रष्टाचार्यांची संपत्ती जप्त करुन जनतेला वाटली तर जनतेला अपचन होईल का? भ्रष्टाचाऱ्याना पुण्य लाभेल कि जनतेला शिव्या शाप?

दिसामाजी काहीतरी ...: आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

दिसामाजी काहीतरी ...: आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या: आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न...

आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

गटारी अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.

आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरातील दीप -निरांजन-कलश इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात. कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो. अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

साभार : मायबोली मिसळपाव  माझा कट्टा