आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

गटारी अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.

आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरातील दीप -निरांजन-कलश इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात. कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो. अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

साभार : मायबोली मिसळपाव  माझा कट्टा  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा