गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,
सभ्य स्त्री पुरुष हो,
बंधु हो, भगिनी हो,
मित्र हो, श्रोते हो, वाचकहो,
मी सांगणार आहे ते महत्वाचे असल्याचा मी दावा करणार नाही. पण माझ्या अनुभवातुन जे काही मी शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी घेणार आहे.
माझ्या साठी माझे पहिले शिक्षक म्हणजे माझे आई बाबा.
ज्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत किंवा घडतील, त्यांच श्रेय मी माझ्या आई बाबाना देतो. माझ्यावर जे काही चांगले संस्कार झाले आणि अजुनही होत आहेत, ते माझ्या आई बाबामुंळे.
शाळा मला नेहमी तुरुंगच वाटायची, 10 वर्षे वाट पाहिल्यावर शाळेच्या तुरुंगातुन सुटका झाली. पण शाळे बाहेरच्या जंगलात आल्यावर शाळाच उबदार वाटु लागली,
माझ्या बाबतीत तरी अभ्यासापेक्षा शिक्षेच्या आठवणी जास्त आहेत. शिक्षकानी घालुन दिलेली शिस्त कधी झेपलीच नाही. माझ बालमन खिडकीच्या बाहेरच जग शोधत असायच. तरी सुद्धा जी काही शिस्त किंवा बालमनाचा कोष सोडुन बाहेर यायला मदत झाली त्याच श्रेय माझ्या शाळेतल्या शिक्षकाना आहे.
कॉलेज आणि माझा संबंध, प्रवेशाचा पहिला आठवडा आणि परीक्षेच्या काळापुरता मर्यादित राहिला. अगदीच आर्थिक दंड किंवा पालकाना बोलवायची परीस्थिती आली तर नाईलाजाने कॉलेजात जाणे होई. तरी सुद्धा शिक्षकानी सांभाळुन घेतल. अवेळी विचित्र शंका किंवा प्रश्न असले तरी उत्तर समजावुन दिली. त्यामुळे निदान पदवी तर मिळाली.
अल्प अभ्यासाच्या काडीने पदव्युत्तर शिक्षणाची पात्रता परीक्षा सुद्धा पार केली. MCA च्या शिक्षणाच्या वेळी शिक्षकानी मला सुधारण्याचा फार प्रयत्न केला, मी अभ्यासच केला नाही, थोड्या प्रयत्नानंतर मी सोडुन दिला MCA चा नाद. अर्थात मला पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करुन डॉक्टरेट करायची आहे आणि माझ्या पहिल्या शिक्षकांचा अर्थात आई बाबांचा अजुनही पाठिंबा आहे.
माझ्या सहधर्मचारणीच्या उल्लेखाशिवाय हे पुराण अपुर्ण राहिल असत, पत्नी ही गुरुस्थानी असु शकते हे लग्नानंतरच समजल. पुस्तक किंवा कुणी वयक्तिक अनुभवात हे सांगितल नव्हत! लोक लाजतात कि हे स्वत:च अनुभवयाच असते म्हणुन सांगत नाही?
माझ्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त विद्यालयीन नव्हे, जीवनातल्या प्रत्येक क्षणाला परीक्षा चालुच असते. प्रत्येक अनुभव आणि माणुस माझे शिक्षक बनले आहेत.
प्रत्येक विद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी माझ्या पालकांची ओळख आणि पुण्याई कामी आली. ह्यात काही अतिशयोक्ती नाही,काही असेलच तर शिक्षकांचे न ऐकणे हा माझा नाकर्तेपणा म्हणता येईल.
पुस्तक वर्तमानपत्र जाहिराती चित्रपट आणि इतर दृश्य किंवा श्राव्य माध्यमानी सुद्धा खुप शिकवल आहे. इंटरनेटचा तर फार प्रभाव पडला आहे. माझ्या जवळ ज्ञानाची जी काही अल्प तुटपुंजी जमा आहे, त्यात इंटरनेटचा मोठा हिस्सा आहे.
तर अश्या ह्या सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली माझी जीवनयात्रा सुरु आहे.
हे जे काही तुम्ही वाचले ते तुमच्या पसंतीस आले नसल्यास, तो माझाच कमी पणा समजावा, मी शिक्षकांच्या सांगण्यानुसार वागण्यास कमी पडलो हाच अर्थ घ्यावा.
तुमचा फार वेळ घेतला असल्यास उदार मनाने क्षमा करावी
काही आवडले असल्यास जरुर कळवा, माझ्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा होईल.
आपला नम्र.
एक घडत असलेला विद्यार्थी.
सभ्य स्त्री पुरुष हो,
बंधु हो, भगिनी हो,
मित्र हो, श्रोते हो, वाचकहो,
मी सांगणार आहे ते महत्वाचे असल्याचा मी दावा करणार नाही. पण माझ्या अनुभवातुन जे काही मी शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी घेणार आहे.
माझ्या साठी माझे पहिले शिक्षक म्हणजे माझे आई बाबा.
ज्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत किंवा घडतील, त्यांच श्रेय मी माझ्या आई बाबाना देतो. माझ्यावर जे काही चांगले संस्कार झाले आणि अजुनही होत आहेत, ते माझ्या आई बाबामुंळे.
शाळा मला नेहमी तुरुंगच वाटायची, 10 वर्षे वाट पाहिल्यावर शाळेच्या तुरुंगातुन सुटका झाली. पण शाळे बाहेरच्या जंगलात आल्यावर शाळाच उबदार वाटु लागली,
माझ्या बाबतीत तरी अभ्यासापेक्षा शिक्षेच्या आठवणी जास्त आहेत. शिक्षकानी घालुन दिलेली शिस्त कधी झेपलीच नाही. माझ बालमन खिडकीच्या बाहेरच जग शोधत असायच. तरी सुद्धा जी काही शिस्त किंवा बालमनाचा कोष सोडुन बाहेर यायला मदत झाली त्याच श्रेय माझ्या शाळेतल्या शिक्षकाना आहे.
कॉलेज आणि माझा संबंध, प्रवेशाचा पहिला आठवडा आणि परीक्षेच्या काळापुरता मर्यादित राहिला. अगदीच आर्थिक दंड किंवा पालकाना बोलवायची परीस्थिती आली तर नाईलाजाने कॉलेजात जाणे होई. तरी सुद्धा शिक्षकानी सांभाळुन घेतल. अवेळी विचित्र शंका किंवा प्रश्न असले तरी उत्तर समजावुन दिली. त्यामुळे निदान पदवी तर मिळाली.
अल्प अभ्यासाच्या काडीने पदव्युत्तर शिक्षणाची पात्रता परीक्षा सुद्धा पार केली. MCA च्या शिक्षणाच्या वेळी शिक्षकानी मला सुधारण्याचा फार प्रयत्न केला, मी अभ्यासच केला नाही, थोड्या प्रयत्नानंतर मी सोडुन दिला MCA चा नाद. अर्थात मला पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करुन डॉक्टरेट करायची आहे आणि माझ्या पहिल्या शिक्षकांचा अर्थात आई बाबांचा अजुनही पाठिंबा आहे.
माझ्या सहधर्मचारणीच्या उल्लेखाशिवाय हे पुराण अपुर्ण राहिल असत, पत्नी ही गुरुस्थानी असु शकते हे लग्नानंतरच समजल. पुस्तक किंवा कुणी वयक्तिक अनुभवात हे सांगितल नव्हत! लोक लाजतात कि हे स्वत:च अनुभवयाच असते म्हणुन सांगत नाही?
माझ्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त विद्यालयीन नव्हे, जीवनातल्या प्रत्येक क्षणाला परीक्षा चालुच असते. प्रत्येक अनुभव आणि माणुस माझे शिक्षक बनले आहेत.
प्रत्येक विद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी माझ्या पालकांची ओळख आणि पुण्याई कामी आली. ह्यात काही अतिशयोक्ती नाही,काही असेलच तर शिक्षकांचे न ऐकणे हा माझा नाकर्तेपणा म्हणता येईल.
पुस्तक वर्तमानपत्र जाहिराती चित्रपट आणि इतर दृश्य किंवा श्राव्य माध्यमानी सुद्धा खुप शिकवल आहे. इंटरनेटचा तर फार प्रभाव पडला आहे. माझ्या जवळ ज्ञानाची जी काही अल्प तुटपुंजी जमा आहे, त्यात इंटरनेटचा मोठा हिस्सा आहे.
तर अश्या ह्या सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली माझी जीवनयात्रा सुरु आहे.
हे जे काही तुम्ही वाचले ते तुमच्या पसंतीस आले नसल्यास, तो माझाच कमी पणा समजावा, मी शिक्षकांच्या सांगण्यानुसार वागण्यास कमी पडलो हाच अर्थ घ्यावा.
तुमचा फार वेळ घेतला असल्यास उदार मनाने क्षमा करावी
काही आवडले असल्यास जरुर कळवा, माझ्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा होईल.
आपला नम्र.
एक घडत असलेला विद्यार्थी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा