दारू पेक्षा जास्त विषारी प्रश्न ?

विषारी दारु प्रकरणानंतर पडलेले प्रश्न.

ज्या भागातले लोक मेले नाहीत
तिकडे लोक दारु पितच नाहीत?
कि दारु चांगल्या प्रकारची बनवतात?

बिनविषारी दारु बनवाणारे उद्योजक कि समाजसेवक?

बिनविषारी दारु बनवणारे मॅगी चांगली बनवतात का?

विषारी दारु पिउन नष्ट झाले त्यांच्यामुळे उरलेली दारुपण नष्ट झाली का?

जी दारु नष्ट केली गेली ती विषारी होती कि बिनविषारी ?
ह्या विषाची परीक्षा घेणारे नियमीत घेत होते का?

बिनविषारी दारुच्या गुत्त्यांवर कोणी पहारा देतात का?

जे मेले त्यांच्या कुटुंबियाना मयताच्या जागी काम कराव लागणार असेल तर त्यांच्या साठी विषपरीक्षा कोण करणार?

ज्या सरकारी अधिकार्यांवर निलंबन किंवा बडतर्फी लागु झाली आहे त्यानी कुणावर बोट दाखवायच?
दारु पिणार्यांवर कि विकणार्यांवर कि बनवणार्यांवर कि दारुसाठी कच्ची सामग्री उपलब्ध करुन देणार्यांवर?

किती वेळा विषारी दारु कांड घडल्यावर दारुबंदी लागु होइल ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा