मनःशुध्दीसाठी

महाभारतातील ही गोष्ट आहे.
नक्की वाचा
पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी त्यांनी तीर्थस्नानांची यात्रा करण्याचे ठरविले. श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व त्याची संमती घेण्यासाठी सर्व पांडव त्याच्याकडे गेले.
श्रीकृष्ण म्हणाला, "जात आहात तर जा. परंतु मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची फांदी देतो.
तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."
पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.
तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व पांडवांनी श्रीकृष्णाची भेट घेतली व त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले, "आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."
श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे तुकडे करुन सर्वांना खावयास दिले व म्हणाला, "प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."
सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच केले. कारण प्रसादाची चव कडूच होती.
श्रीकृष्णाने विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करुनही कडूनिंबाची चव गोड झाली का ?" "कशी होईल ? स्नान घालून बाह्य बदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल?" धर्मराजाने प्रश्न केला.
श्रीकृष्ण म्हणाला, "तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल. परंतु मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी कशी होईल? त्यांचा संबंध सदाचरणाशी, सदगुणांशी आहे.
बोध :
मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा,
सत्त्वगुण यांनी सुस्नान व्हावे तीर्थस्नानांने नव्हे.
करा विचार !
नाहितर चला नाशिकला गोदाकाठी...!!.
🚩🙏

स्वातंत्र्यसमर आणि गृहस्ती.

लंडनमध्ये लॉर्ड कर्झन चा वध केल्यानंतर मदनलाल धिंग्रांनी त्याला वाचवायला आलेल्या लालकाका ला हि उडवले ...मदनलाल धिंग्रा ह्यांना पकडले व त्यांची स्थिर नाडी बघून पोलीसही चक्रावले ....ज्या एमा बेक ह्या मैत्रिणीने मदनलालना पार्टी ला बोलावले होते ती तर स्तंभित झाली होती ...
एवढ्यात आक्रोश करत कर्झनची पत्नी तिथे आली ...तिचा टाहो ऐकून सगळेच हेलावले ....
ह्या प्रसंगाचा वृत्तांत सांगण्यासाठी तिथे धिंग्रांचा अजून एक सहकारी तिथे उपस्थित होता संपूर्ण प्रसंग सांगता सांगता ...ह्या पत्नीच्या आक्रोशाचे वर्णन हा सहकारी आपल्या नेत्याला हसत हसत सांगू लागला ...ते कर्झनचे प्रेत ..ती छाती पिटणारी मड्डम वगैरे वगैरे ... ते खळखळणारे हसू ऐकताच सर्व वृत्तांत हाताची घडी घालून गंभीर पणे ऐकून घेणाऱ्या त्या नेत्याने आपल्या तीक्ष्ण नजरेने त्या ह्स्तकाकडे बघितले ... नापसंतीची एक पुसत रेषा त्यांच्या कपाळावर उमटली ...सर्व कथन संपल्यावर त्या हस्तकाला तिथून जायला सांगितले गेले ...तो तिथून पुरेसा दूर जाताच तो नेता उर्वरित सहकार्यांकडे बघून म्हणाला "ह्या माणसाला आत्तापासून आपल्या संघटनेतून बडतर्फ केले आहे ... एका विधवेच्या विलापात जो आनंद मानतो तो कधीही विश्वासपात्र नसतो ...कुणाच्याही मृत्यू चा विनोद होऊ शकत नाही...हा माणूस लौकरच काहीतरी घोळ करेल ..." आश्चर्य म्हणजे पुढे काहीच महिन्यात हा सहकारी एका सामान्य गुन्ह्यात अडकला आणि अतिशय लाजिरवाणी शिक्षा होऊन अब्रू घालवून बसला ...
बँरिस्टर विनायक दामोदर सावरकर आपले एक एक सहकारी पारखून घेत ते हे असे ...
जाता जाता : त्याच वेळी लंडन मध्ये शिकणाऱ्या एका दुसऱ्या बलिष्टराला त्याच्या भारतातील बलिष्टर पित्याने ह्या सगळ्या भानगडीत तू अजिबात पडू नकोस अशी तार ठोकली होती ...खुद्द मदनलाल ह्यांच्या पित्याने त्यांना disown केले होते ..
कधीतरी वाचलेले काय काय आठवत राहते मला ...
(-Abhijit Kaskhedikar
ह्यांच्या द्वारे फेसबूकवर प्रकाशित असल्याचे पाहिले व तुम्हा सोबत सामायिक केले.)

अस काही वाचल कि देशभक्ती जागी होते
हृदयाचे ठोके मोजण्यापलीकडे जातात
शरीराच्या रोमा रोमात रक्त उसळते ,
ह्य गद्दारांचा वध करायला मनगट शिवशिवतात
मग गृहस्थीच्या प्रेमळ शृंखला संसाराला जखडतात..

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने,

सभ्य स्त्री पुरुष हो,
बंधु हो, भगिनी हो,
मित्र हो, श्रोते हो, वाचकहो,

मी सांगणार आहे ते महत्वाचे असल्याचा मी दावा करणार नाही. पण माझ्या अनुभवातुन जे काही मी शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी घेणार आहे.

माझ्या साठी माझे पहिले शिक्षक म्हणजे माझे आई बाबा.
ज्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत किंवा घडतील, त्यांच श्रेय मी माझ्या आई बाबाना देतो. माझ्यावर जे काही चांगले संस्कार झाले आणि अजुनही होत आहेत, ते माझ्या आई बाबामुंळे.

शाळा मला नेहमी तुरुंगच वाटायची, 10 वर्षे वाट पाहिल्यावर शाळेच्या तुरुंगातुन सुटका झाली. पण शाळे बाहेरच्या जंगलात आल्यावर शाळाच उबदार वाटु लागली,
माझ्या बाबतीत तरी अभ्यासापेक्षा शिक्षेच्या आठवणी जास्त आहेत. शिक्षकानी घालुन दिलेली शिस्त कधी झेपलीच नाही. माझ बालमन खिडकीच्या बाहेरच जग शोधत असायच. तरी सुद्धा जी काही शिस्त किंवा बालमनाचा कोष सोडुन बाहेर यायला मदत झाली त्याच श्रेय माझ्या शाळेतल्या शिक्षकाना आहे.

कॉलेज आणि माझा संबंध, प्रवेशाचा पहिला आठवडा आणि परीक्षेच्या काळापुरता मर्यादित राहिला. अगदीच आर्थिक दंड किंवा पालकाना बोलवायची परीस्थिती आली तर नाईलाजाने कॉलेजात जाणे होई. तरी सुद्धा शिक्षकानी सांभाळुन घेतल. अवेळी विचित्र शंका किंवा प्रश्न असले तरी उत्तर समजावुन दिली. त्यामुळे निदान पदवी तर मिळाली.

अल्प अभ्यासाच्या काडीने पदव्युत्तर शिक्षणाची पात्रता परीक्षा सुद्धा पार केली. MCA च्या शिक्षणाच्या वेळी शिक्षकानी मला सुधारण्याचा फार प्रयत्न केला, मी अभ्यासच केला नाही, थोड्या प्रयत्नानंतर मी सोडुन दिला MCA चा नाद. अर्थात मला पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करुन डॉक्टरेट करायची आहे आणि माझ्या पहिल्या शिक्षकांचा अर्थात आई बाबांचा अजुनही पाठिंबा आहे.

माझ्या सहधर्मचारणीच्या उल्लेखाशिवाय हे पुराण अपुर्ण राहिल असत, पत्नी ही गुरुस्थानी असु शकते हे लग्नानंतरच समजल. पुस्तक किंवा कुणी वयक्तिक अनुभवात हे सांगितल नव्हत! लोक लाजतात कि हे स्वत:च अनुभवयाच असते म्हणुन सांगत नाही?

माझ्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त विद्यालयीन नव्हे, जीवनातल्या प्रत्येक क्षणाला परीक्षा चालुच असते. प्रत्येक अनुभव आणि माणुस माझे शिक्षक बनले आहेत.

प्रत्येक विद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी माझ्या पालकांची ओळख आणि पुण्याई कामी आली. ह्यात काही अतिशयोक्ती नाही,काही असेलच तर शिक्षकांचे न ऐकणे हा माझा नाकर्तेपणा म्हणता येईल.

पुस्तक वर्तमानपत्र जाहिराती चित्रपट आणि इतर दृश्य किंवा श्राव्य माध्यमानी सुद्धा खुप शिकवल आहे. इंटरनेटचा तर फार प्रभाव पडला आहे. माझ्या जवळ ज्ञानाची जी काही अल्प तुटपुंजी जमा आहे, त्यात इंटरनेटचा मोठा हिस्सा आहे.

तर अश्या ह्या सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली माझी जीवनयात्रा सुरु आहे.

हे जे काही तुम्ही वाचले ते तुमच्या पसंतीस आले नसल्यास, तो माझाच कमी पणा समजावा, मी शिक्षकांच्या सांगण्यानुसार वागण्यास कमी पडलो हाच अर्थ घ्यावा.
तुमचा फार वेळ घेतला असल्यास उदार मनाने क्षमा करावी
काही आवडले असल्यास जरुर कळवा, माझ्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा होईल.

आपला नम्र.
एक घडत असलेला विद्यार्थी.

On 27th July 2015.

So, on 27th July 2015.

Gurdaspur, Punjab was hit by secular terrorist attacks. Few dead, candle march has been arranged at your nearby popularity center.

Dr. APJ Abdul Kalam took his last breath while sharing wisdom & vision. People have forwarded messages which Kalam never said. Things Kalam said, might never be followed.

Peace Warrior Yakub Memon's death penalty's decision forwarded for opinion poll of judges. 257 souls waiting for decision since 22 years.

Animal Friend & Human Being Salman Khan's 12 years case final (never heard of this word before) hearing on 30th July. He may be set free or punished with minimal time in jail, he might be able to attend functions & cinema shootings.

Nothing #religious about it.

मराठीत बोला , मराठी वाचवा चळवळ.

मराठी नेत्यांच्या ताब्यात बहुतेक सगळी विद्यालय आणि शिक्षणसंस्थान आहेत. पण कारभार चालवणारे इंग्रजांचे वारसदार आहेत. इंग्रजी शिक्षणपद्धतीचे गुलाम आहेत, आणि प्रत्येक पिढी गुलामीचे बाळकडु घेउन पुढे सरकतात.. त्यामुळे मराठी बाणा व्यर्थच आहे.

ज्याना मराठी बाण्याचा अभिमान आहे त्यानी राजकारण अर्थकारण ह्या दोन गोष्टीत प्राविण्य मिळवुन शिक्षणसंस्था चालु कराव्या. मराठी माणसांच्या मराठी माणसानी मराठीच्या प्रचारासाठी चालवलेल्या शिक्षणसंस्था.
मग चळवळ करायची गरज पडणार नाही.

कपाळी टिळा व पांडुरंग हरि चा ट्रेंड -_-

सध्या व्हाट्सअप आणि फेसबूकवर खालील संदेश प्रसारित होत आहे.


उद्या आपल्या हिंदूंचा सण ....आषाढी एकादशी !!! ...कपाळी गुलाल लावा बुक्का लावा ....शाळेत असो वा ऑफिस मध्ये.... घरी असो कि सोसायटीत....रेल्वेत असो कि बस मध्ये असो कि बाईक वर .... जीन्स मध्ये असो कि थ्रीफोर्थ्स मध्ये...बॉयफ्रेंड असो कि गर्लफ्रेंड...सज्जन असो कि टपोरी असो ....जो हिंदू दिसेल त्याला उद्या "पांडुरंग हरि" "पांडुरंग हरि" म्हणूनच संबोधन करा ....नको ते "हाय हाय" "बाय बाय" "यो यो" किंवा आणखी काही !!! केवळ "पांडुरंग हरि" उद्या ट्रेंड बनवा "कपाळी टिळा व पांडुरंग हरि" चा !

----------------------

मी म्हणतो, रोज देवाच नाव घेतल तर जीभ बारीक होईल का तुमची?

आषाढी पुरता हिंदु?
अरे, रोज सण साजरे करा.
हिंदुत्वाचा जयजयकार करा.
गर्जु दे हिंदुत्वाची गगनभेदी ललकारी..

भित्र्यासारख एक दिवस बोलायच पांडुरंग हरी..
रोज लावणार का गुलाल बुक्का?
तुमच्या निधर्मी विदेशी ऑफिसात नाही चालणार ना?
उंदरा सारखे चोरुन सण साजरे करा.

रक्त उसळते असले ट्रेंडी धार्मिक पाहिले की,
म्यानातुन तलवारीच पात उसळते तस..

ईतर धर्मीय असले ट्रेंड ठेवतात का?

देवा धर्माच्या नावा खाली एक दिवस celibration ?
सेल्फी काढुन dp ठेवा.
फेसबूक वर लाईक्स मिळाले की तुम्ही परमार्थाला पोहचले कि,
मग असे ढोंगी सेल्फी टॉयलेट पेपरवर छापुन मी *** पुसेन

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

🚩🙏

मराठी माणुस आणि उद्योग

त्यापेक्षा मराठी तरुणाना बांधकाम व्यवसाय शिकवा.. मुंबईवर मराठी राज्य पाहिजे ना? सर्व व्यवसायात मराठी तरुणाना प्रशिक्षण आणि संधी द्या. शिवसेना , मनसे , स्वाभिमानचे नेते बांधकाम व्यवसायिक होते / आहेत.

मराठी माणुस बाकी समाजाइतका (मुंबईत स्वत:ची हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्याइतका तरी) श्रीमंत झाला तर काय कुणाची बिशाद आहे बोट दाखवण्याची?

पण आपण चव्हाण कुटुंबियाना न्याय मिळवनु देताना मुख्य मुद्दाच सोडुन देतो आहोत.

ह्या वादात गुजराती/जैन नेते पुढे आले का?
त्याना माहिती आहे मराठी माणुस मोठ स्वप्न बघणार नाही, शेवटी आपल्याकडेच घर मागायला येईल.

आज मराठी बिल्डरने बांधलेल्या बिल्डींगमध्ये सगळीच मराठी माणस असती तर?

फार पुर्वी मुंबई चाळ आणि गरणी संस्कृतीची होती तेव्हाच सुरुवात करायला हवी होती.. चाळी आणि गिरण्याच्या जमिनी कुणाच्या ताब्यात कुणाच्या सहकार्याने गेल्या?  पण आपण लुंगीला विरोध करताना गेली 35-40 वर्षे फक्त वडापाव च्या गाड्याच टाकल्या.. दुसरे काही उद्योग शिकवले किंवा मदत मिळवुन दिली तर? गिरण्या बंद पडल्यामुळे वडापावाच्या नावाखाली रस्त्यावर आणण्यात आला मराठी माणुस. वडापाव विकण्यात कमीपणा नाही, पण फक्त वडापाव विकण्यात कोणती प्रगती आहे?
वडपावाचे पुरस्कर्ते नेते बिल्डर आणि मोठे व्यावसायिक  झाले ना? मग वडापावाच्या जोडीला बांधकामास पुरक धंद्यांच शिक्षण आणि मदत द्या मराठी तरुणाना.. तिथे असलेली परप्रांतियांचीच मक्तेदारी मोडुन काढा. महाराष्ट्रातले उद्योगधंद्यांवर मराठी तरुणानी वर्चस्व मिळवले पाहिजे.

स्वाभिमान आणि स्वामिभक्ती मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे, पण लाचारांच्या फौजाच निवडणुकीत कामाला येतात. ब्रिटीश गेले पण फोडा आणि राज्य करा हेच शिकवुन गेले.  म्हणुन मराठी माणुस अश्या बातम्या पहातोय.

मायाजाळ

किटकनाशक असलेली पेप्सी कोला पाहिजे!!
अतिप्रमाणात कृत्रिम द्रव्य असलेली चॉकलेट्स पाहिजे!!
अनैसर्गिकरीत्या टीकणारे पिझ्झा आणि बर्गर पाहिजे!!
कुकीजच्या नावाखाली मैद्या पासुन बनवलेली बिस्कीट्स पाहिजेत!!
ज्या हॉर्लिक्स बोर्नव्हीटामुळे कुठल्याही पिढीत ऑलिम्पिक विजेते लाभले नाहीत ती पाहिजे!!
जी पावडर क्रिम साबण लावुन कोणीही गोरे झाले नाही ते पाहिजे!!

गेल्या 50-60 वर्षात नफेखोर उद्योगधंद्यानी आपल्या बुद्धीवर असे काही मायाजाळ टाकले आहे , कि पाहिलेली प्रत्येक वस्तु एकदा तरी वापरायची गरज भासते. हे व्यसन आपण स्वत:वर लादुन घेतले आहे!! ह्यातुन सुटका म्हणजे संसारातुन निवृत्ती असेच समीकरण बनवले गेले आहे!!

साबण आणि पावडर लावुन गोरे होतात तर जॉनी लिवर तसाच कसा राहीला गेली 25 वर्षे ?
कॉम्प्लॅन बॉय आणि गर्ल कॉम्प्लॅन घेउन सुद्धा वाढले नाही.  शेवटी स्टेरॉईड्स घेउन त्यानी सिनेमासृष्टीत जम बसवण्यापुरती शरीर बनवल.. तुम्ही स्वत:सुद्धा इंटरनेटवर त्यांचे फोटो पाहु शकतात..

कुठलीशी पावडर खाउन बुद्धी वाढते ना ? मग हि जाहिरात करणारी मुल किंवा  माणस कुठल्या क्षेत्रात चमकताना का दिसत नाहित ?

च्यवनप्राशची जाहिरात करणारे स्वत:च आजारी पडतात..

केस लंबे काले घने करण्यासाठी अमेरीका युरोपला जाउन ट्रीटमेंट घेतात पण जाहीरात मात्र कुठल्याही तेलाची करतात..

करोडो रुपयांची संपत्ती असतानासुद्धा ,
अत्यंत हानिकारक असलेल्या दारु सिगारेट पान-मसाला गुटख्याची जाहिरात करतात..

हे क्रिकेटपटु आणि तथाकथित अभिनेते अभिनेत्री आपल्याला किती मुर्ख बनवतात पण आपण शेवटी त्यानी जाहिरात केलेली कोल्डड्रिंक्स शाम्पु साबण आणि इतर हानिकारक वस्तु घेतो..

जय उद्योग , जय व्यापर ,
जय जाहिरात, मर ग्राहक.

महाराज आणि स्मारक

सरकारकडे विद्यार्थ्याना वह्या पुस्तके शिष्यवृत्ती द्यायला पैसा नाही..

सरकारकडे शिक्षकाना आणि इतर सरकारी कर्मचार्याना पगार द्यायला पैसा नाही..

सरकारी शाळा दवाखाने आणि इतर आवश्यक इमारतींच्या डागडुगीसाठी पैसा नाही..

जे उभे आहेत त्या किल्ल्यांची डागडुजी करायला पैसा नाही..

खेडेगावत दुर्गम भागात पाणी आणि जिवनावश्यक सेवा पुरवायला पैसा नाही..

दर महिन्याला सरकारी तिजोरीत खडखडाट आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याच्या बातम्या येतच असतात..

शिवाजी महाराजानी स्वत:चे किंवा स्वत:च्या पराक्रमी पुर्वजांचे अवाढव्य स्मारक उभारले नाही..

स्मारक बांधले जाईल , तिथे येण्या जाण्यासाठी जलवाहतुक सुरु होइल, स्मारकाची देखभाल नियमीत दुरुस्ती , इत्यादी आवश्यक गोष्टी करीता कुठल्याश्या गरीब नेत्याला त्याचे कंत्राट मिळेल..

अलिखित टक्केवारीच्या हिशोबानी मोहावलेल्या संधीसाधुना महाराजानी उभारलेल्या सुराज्याची स्वप्न समजलीच नाही..

आता इथे कोट्यावधींची कॉरपोरेट स्मारक कोण कशासाठी बांधत आहेत हे जनतेला  ठाउक नाही का ? जनता आंधळी मुकी बहिरी बनुन मतदान करते, ह्याचा अर्थ असा नाही कि जनतेला हे आवडते, ह्याचा अर्थ इतकाच कि पर्याय नसल्याने हे सर्व चालवुन घेते..

सनातन वैदिक हिंदु धर्म

विद्वान व अधिकारी व्यक्ती व संस्थानी पुढाकार घेउन सामान्य हिंदु तसेच कोणत्याही परधर्मी किंवा निधर्मी व्यक्तीना सुद्धा आचरण करता येईल असे नियम बनवता येतील का ?
कर्मकांड जाचक वाटत असतील तर ते नियम व प्रथा समजावुन देता येतील का ?
ज्या प्रथा कालबाह्य होत आहेत त्या समाजावर न लादता कालानुरुप त्या प्रथेत सुधारणा करता येतील का ?
आपल्या थोर पुर्वजानी जो धर्म जोपासला त्याचा वारसा व व्याप्ती आपल्या अजुन वाढवता येईल का ?
वैदिक हिंदु धर्म हाच सर्वश्रेष्ठ असे नारे लावण्यापेक्षा इतर धर्म व पंथाच्या जाणकारांसोबत चर्चा करुन वैदिक हिंदु धर्मातल्या त्रुटी व उणीवा समजावुन घेतील का ?
शंकराचार्यानी चर्चेने सर्व विरोधकाना जिंकले होते ना ?
आज सामन्य जनता हिंदु धर्माच्या उच्चपदावरील व्यक्तीना ढोंगी बाबा समजते ,ह्याचे कारण अश्या उच्च व्यक्ती व सामन्य जनतेच्या मध्ये धर्माचे दलाल बसले आहेत त्यांचा नित्पात कसा करता येईल ?
सनातन वैदिक हिंदु धर्म हाच श्रेष्ठ व सर्वव्यापी असायला हवा तर प्रत्येकाला तो आपला वाटायला हवा.

दारू पेक्षा जास्त विषारी प्रश्न ?

विषारी दारु प्रकरणानंतर पडलेले प्रश्न.

ज्या भागातले लोक मेले नाहीत
तिकडे लोक दारु पितच नाहीत?
कि दारु चांगल्या प्रकारची बनवतात?

बिनविषारी दारु बनवाणारे उद्योजक कि समाजसेवक?

बिनविषारी दारु बनवणारे मॅगी चांगली बनवतात का?

विषारी दारु पिउन नष्ट झाले त्यांच्यामुळे उरलेली दारुपण नष्ट झाली का?

जी दारु नष्ट केली गेली ती विषारी होती कि बिनविषारी ?
ह्या विषाची परीक्षा घेणारे नियमीत घेत होते का?

बिनविषारी दारुच्या गुत्त्यांवर कोणी पहारा देतात का?

जे मेले त्यांच्या कुटुंबियाना मयताच्या जागी काम कराव लागणार असेल तर त्यांच्या साठी विषपरीक्षा कोण करणार?

ज्या सरकारी अधिकार्यांवर निलंबन किंवा बडतर्फी लागु झाली आहे त्यानी कुणावर बोट दाखवायच?
दारु पिणार्यांवर कि विकणार्यांवर कि बनवणार्यांवर कि दारुसाठी कच्ची सामग्री उपलब्ध करुन देणार्यांवर?

किती वेळा विषारी दारु कांड घडल्यावर दारुबंदी लागु होइल ?

संमेलन ते सुद्धा चोरून (अर्थातच!)

चोरुन भरेल सुद्धा संमेलन
चोरांच्या वाटा चोरालाच ठावुक.
उपभोगल जाईल साहित्य
ओरिजनल होतील भावुक.
कविंचे पीक उदंड
काव्य पिकतय घाउक.
यमकाला जुळवायच यमक
पितळेवर सोन्याची चमक.
उठला कवी कि काव्य फेक
कधी कॅश तर कधी चेक.
दोन वेळेच जेवण, प्रवासाचा खर्च
नोकरी अधिक उधारी, भागतय घरच.
झब्बा कुर्ता शबनम आणि दाढी
कधी डावे कधी उजवे, कधी युती कधी आघाडी.
कोण पाहतय ओरिजीनल आणि डुप्लिकेट
टाळ्या वाजल्या कि शाल श्रीफळ भेट.
प्रेमकाव्य ते क्रांतीची मशाल
प्रवास करावा बिंधास्त खुशाल.
आपणच उठवायची आपलीच आवई
साहित्यक्षेत्राचे पदसिद्ध जावई.
तोंडच्या काव्याला कशाला आरसा
चोरानीच चालवयाचाय थोरांचा वारसा.

समलिंगी

genetic mutation मुळे एखादी व्यक्ती विरुद्ध लिंग (स्त्री ला पुरुषाचे लिंग, किंवा पुरुषाला योनी) घेउन जन्माला येते, कधी संपुर्ण स्त्रीदेह किंवा पुरुषदेह म्हणुन जन्माला आलेल्या व्यक्तीला समजुन न घेता , जबरदस्ती करणार का?

निसर्गाने दिलेल्या शरीरात जन्माला आले , ही प्रकृती,
त्या शरीरावर किंवा मनावर जबरदस्ती तुमचे नियम लादणे ही विकृती, खर म्हणजे बलात्कार.

तस पाहिल तर समलिंगी संबंधामुळे संतती नियमन होईल ना ?
मुळात बहुतेक समलिंगी हे कलासक्त असतात. सामान्य आणि ढोंगी लोकांसारखे विषयासक्त नाही.
ज्यानी डोळे कान आणि मेंदु उघडे ठेवले आहेत , त्याना हे समजते, पण वाचनाला बुरशी , विचाराना किड आणि अनुभवाच्या ईंद्रियाना बधीरपणा आलाय त्यांच्याकडुन अपेक्षा व्यर्थच आहेत.

धर्म , इतिहास आणि अतिरेक

प्रत्येकाला धर्माचा अभिमान असतो
आणि असायलाच हवा.
पण ज्यांच पोट धर्मावर अवलंबुन आहे
ते धर्माचा अतिरेक करतात,
मग दंगे आणि द्वेष पसरायला वेळ लागत नाही.
धर्म घरात किंवा खाजगी जागेत ठेवला
तर कुणाला त्रास होत नाही.
जेव्हा धर्म सार्वजनिक होतो ,
तेव्हाच सगळ्या समस्या उभ्या रहातात.
इतिहास सांगतो,
देव आपल्याला वाचवतील
म्हणुन सामान्य हिंदु सुस्त बसुन राहीले
आणि परकीय आक्रमणाचे शिकार झाले.
आता हे ईतक सोप्प नाहीये,
कारण सर्वच धर्मात माथेफिरु आहेत,
पण इस्लाम जास्त बदनाम आहे
आणि त्यामुळेच धार्मिक बातम्याना महत्व दिले जाते.

जीन्स पुराण

जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स शिवुनसुद्धा मिळतात!!
आठवड्याचे 5 दिवस सक्तीने ट्राउझर घातल्यावर 2 दिवस जीन्स वापरण्याचा आनंदच वेगळा..
जीन्स पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत , आणि उन्हाळ्यात गरम होते.
जीन्स प्रवासात उत्तम सोबती असतात, कितीही मळल्या तरी वापरता येतात.
जीन्सवर शर्ट टी-शर्ट, झब्बा कुर्ता काहिही शोभते.

अगदीच तुलना करायची तर ,
ट्राउझर म्हणजे स्कॉच, जीन्स म्हणजे बीअर.

ज्याचा त्याचा चॉईस असतो.
अर्थात पायाला अतिघट्ट बसणार्या जीन्स 'मुल' का घालतात हे समजत नाही!!
 जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स तुम्हाला हव्या त्या मापात शिवुनसुद्धा मिळतात!! फक्त शिंपी चांगला पाहिजे.
आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे चांगली शिवलेली जीन्स वेगवेगळ्या किंवा नको त्या ठीकाणी फाडल्यास किंवा ठिगळ लावल्यास जीन्सला परी पुर्णता येते !!!

मोदीद्वेशी कि अंधद्वेशी ?

मोदीद्वेशी सेक्युलरोके लिये खास,

आपके प्यारे पिछले सरकारो ने पुरा पाकिस्तान दे दिया.. अब मोदी को बुरखा पेहेनके उंगली कर रहे हो !!

मोदी बाकी आफ्रिकी,युरोपीय, मध्य आशिआई देशोसे राजनैतिक संबंध मजबुत कर रहे है. ऐसे देश जो भारत से आयत करे, और हमे अधिक चलन प्राप्त हो.

पाकिस्तानी कुत्ते बॉर्डरपर भौक रहे है,
अगर भारत करारा जवाब दे, तो पाकि युनायटेड नेशन्स के पिछे छुप जायेंगे. जो वो 1947 से करते आ रहे है.

और यहा देश के गद्दार पाकियो से मिलके फेसबुक ट्वीटर पर टट्टी कर रहे है..

तुम जैसे घर के भेदी देश को कमजोर बना रहे हो..

अगर मोदी सपोर्टर अंधभक्त है तो तुम कौनसा देश प्रेम जता रहे हो?
पुरा दिमाग नकारात्मक और झूटी खबरोसे भरा हुआ है.
कभी सबूत दिखाओ.

जो भी बंदर उठे वो मोदी कि नीजी जिंदंगी मै घर ना बसने कि गुलाटी मारता है..

तुमने घर बसा के कौनसी देश कि सेवा कि है?

ये मोदी को दोष देने वाले सब विदेशी वस्तुए इस्तेमाल करते है. अभीभी ये मेसेज वो विदेशी स्मार्टफोनमे ही पढ रहे है!!

जिनको मोदी पसंद नही वो ये समझे कि देश कि 65% से ज्यादा जनताने उन्हे स्विकार किया है. बचे 35% मे आधे घुसखोर और बाकी बहुतांश अंधद्वेशी है.

फार तिखट प्रश्न आणि दुखद उत्तर !!

कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते,
त्यांच्यावर आरोप होतात ,
सामान्य जनता समजु शकते.

पण **चे जे नेते निवडुन न येता सुद्धा
कोट्याधिश झाले,
त्यांच काय?
मध्यम वर्गात जन्मलेले नेते
कुठले उद्योग करुन करोडपती झाले?
जरा सामान्य जनतेला पण कळु द्या.
सुरवात करायची तर ,
आदरस्थानापासुन करा सुरवात.

गिरण्या कश्या विकल्या गेल्या ?
तिथे मॉल कसे आले?
कुणाचे किती भले झाले?

फार तिखट प्रश्न आणि
दुखद उत्तर आहेत ना?

सोडुन द्या, पुढच्या प्रचाराला लागा,
कर भला, तो हो भला.

शेतकरी आणि कर्ज मुक्ती

सर्व आजी माजी खासदार आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य , सहकारी कारखान्यांचे संचालक मंडळांची जाहिर चौकशी करा आणि बघा कर्ज मुक्ती होते कि नाही..
किमान निवडणुकीत जाहिर केलेली संपत्ती तरी बघा..
हजारो कोटींची संपत्ती घेउन कुठे जाणार हे लोक?
जवळपास सगळे सहकारी कारखाने आणि बॅंकांवर माननीय आणि अनुभवी नेते मंडळीच आहेत,
तरी पण वर्षानुवर्षे तोट्यात कसे !!!
शेतकर्यांपर्यंत कर्जमाफी पोहचतच नाही,
मदत आजारी कारखाने आणि बॅंका गिळंकृत करतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात. असे वाचले आहे.
सत्य काय ते साहेबाना ठाउक!!
पण खिशात दमडी नसणारे नेते
आज शेकडो हजारो करोडचे मालक कसे झाले
ते जनतेला ठाऊक आहे!!
शेवटी शेतकर्यांची काळजी फक्त विरोधी पक्षालाच!!

निधर्मी, अधर्मी या परधर्मी

धर्म आपके गुरु समान है.
निधर्मी, अधर्मी या परधर्मी
आपके दोस्त बंधु सखा हो सकते है,
कठिण समय मे आपकी सहायता कर सकते है,
लेकिन धर्म आपका धर्म
आपको अंदरसे मजबुत बनाता है.
यदी आपका सह धर्मी कमजोर पडे,
तो उनकी मदद किजीये, इससे धर्म बढेगा.
सिर्फ धार्मिक कार्य करके हम आगे नही जा सकते,
हमे आर्थिक और व्यावहारीक सहकार्य करना होगा.
जबतक हम धर्म मे उच्च नीच्चता रखेंगे,
हम खुदके धर्म बांधवो को
दुसरे धर्म मे प्रवेश करने मे मजबुर करेंगे,
समानता ना हि सही, कम से कम सहायता किजीये.
धर्म जताइये, धर्म बढाइये.
अभिमान मे चाहे धर्म को ना रखे
लेकिन धर्म का अभिमान किजीये.
कोई धर्म का अपमान करे,
तो धर्म का अहंकार भी किजीये.

धर्म : निधर्मी, अधर्मी आणि परधर्मी

मुसलमानांशी किंवा इतर धर्मियांशी भांडुन
काय सिद्ध होणार?
प्रत्येक धर्मात त्यांच्या पापाची शिक्षा
लिहिली गेली आहे ना?

स्वत:च्या धर्माची नाचक्की करणार्या
अधर्मी हिंदुपेक्षा राष्ट्रीय परधर्मी बरा!!

धर्मानंतर तुमचा देश तुमची रक्षा करतो.
फार पुर्वी पासुन देश हे धर्म ह्या घटकाने बांधले गेले आहेत.

शस्त्र व धर्म घेउन यवन आले,
त्यानी बळजबरीने इस्लाम लादला.
त्यानंतर हातात धर्म व तराजु घेउन
इंग्रज आणि पोर्तुगीज आले,
त्यानी लबाडी आणि फितुरीने त्यांचा धर्म लादला.
त्याच जोरावर त्यानी कारकुन गुलाम तयार करुन राज्य केले.

देश सोडताना त्यानी हिंदु-मुसलमानात कलह लावुन दिला,
सहिष्णु राष्ट्रपित्याला सुद्दा दंगेखोराना आवरता आले नाही,
स्वत:च्या देशासाठी लढणार्या सुभाषचंद्रांसारख्या सेनानीपेक्षा त्यानी इंग्रजांची बाजु घेतली..

फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानानी हिंदुंच्या निशस्त्र स्त्री पुरुष लहान मुलांवर जे अत्याचार केले त्याना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यानी पाठिशी घातले.

तेव्हा पासुन कॉंग्रेस व सहकारी फक्त मुसलमानांच्या बाजुने असल्याचे चित्र आहे. पण कॉंग्रेस निधर्मी.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने हिंदुना पाठिंबा दिला तर ते अतिरेकी हिंदुत्ववादी?

आज सुद्धा समाजात आणि देशात फुट पडली आहे,
विघातक कारवाया होत आहेत,
त्याला धर्म जबाबदार की नेते?

म्हणुन,
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा.
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

शांत जीवन कि धर्म?

जनता कट्टर धर्मांधाना घाबरते,
सामान्य मुस्लिमाना नाही,
मेणबत्त्या घेउन मोर्चे काढले
म्हणजे शांतीप्रियता होते का?

इतर धर्मांवर सामजिक व आर्थिक वर्चस्व,
तसेच धर्मांतरास प्रोत्साहन देणे हा दहशतवाद नाही?

एक धर्म तुमची माणसे मारुन कमी करतो,
दुसरा न मारता तुमची माणसे कमी करतो.

तुम्हाला काय हवे आहे?
शांत जीवन कि धर्म?
जरी शांत जीवनासाठी
तुम्ही धर्म बदलला तरी
तुम्ही बाहेरचेच रहाणार.

म्हणुन
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब यांचे चरणी..

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

प्रती,
माननीय आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब,

२३ जुलै आणि १ ऑगस्ट हे पुण्यदिन. 

दिन असं लिहिलं कारण तीथी भारतीय आहे. दिन इंग्रजी आणि मॉडर्न आहे
आम्ही सुट्ट्यांपुरता भारतीय असतो. बाकी वेळ इंग्रजी कालगणना सोयीची असते.

प्रात:स्मरणीय लिहिणार होतो , पण रात्री सुरु होऊन प्रात:कालापर्यंत चालणार्या मद्यप्रश्नाला सामाजिक मान्यता आहे. तेव्हा प्रात:कालीन सामाजिक परिस्थिती बाकी प्रहाराप्रमाणेच असते.

तुम्हाला साहेब उपाधी लावल्याबद्द्ल क्षमस्व. तुम्हाला स्वर्गवासी (तुम्ही तरी स्वर्गातच जाल) होऊन 95 वर्षे झाली, इंग्रज जाऊन 68 वर्षे उलटतील. पण जनतेवरच उलटलेल्या नेत्यानी साहेब हि उपाधी प्रतिष्ठेची केली आहे. तेव्हा तुम्ही आमची मानसिक आर्थिक सामाजिक शासकिय आणि राजकिय गुलामगिरी समजुन घ्याल हि अपेक्षा.बघा गुलामीची सवय जातच नाही, आमच्या अपेक्षा संपतच नाहीत, त्यामुळेच देशाला भीकाऱ्यांचा देश म्हणतात का?

देश म्हणजे आसिंधु-सिंधु नाही हो. तुम्ही गेल्यावर तुमचे छायाचित्र टांगवणाऱ्या (सध्या ते ही फक्त जन्मदिन आणि पुण्यदिना पुरता दिसतात) तुमच्या नावाने पक्ष चालवणार्यानी इंग्रज आणि मुस्लिम लीगच्या कृपेने तोडुन मोडुन मिळवला ( तरी पोर्तुगीजानी दिलाच नाही, काही हजार लोक धारातीर्थी पडल्यावर निधर्मी सरकारने गोवा मुक्त केला.) बघा देश स्वतंत्र होतानाच विभक्त करुन मिळवला.. अहो 8x10 च्या खोली करता भांडणार्या सामान्य जनतेला हक्काच्या देशाची आस होती, जमिनीची किम्मत होती त्यानी बलिदान केल. महालात रहाणाऱ्यानी मिळेल तेवढा देश स्विकारला.. 150 वर्षांचा लढा 15 वर्षांच्या वाटाघाटीत (धंद्याची भाषा बोलायची तर घाटाच) संपवुन टाकला. माणस छोट्यश्या खोली साठी आयुष्यभर लढा देतात, पण उतावळ्या नेत्याना सत्तेच बाशिंग बांधायची घाई झाली..

असो. स्वातंत्र्यानंतर ताळतंत्र सोडुन लोक वागु लागले. संस्कार मर्यादा समाज सन्मान लाज निर्भयता सभ्यता ह्यांच्या व्याख्याच बदलल्या.

गेल्या 95 वर्षात विश्वास बसणार नाही असे शोध लागले. पण माणसाचा माणसावर विश्वास बसत नाही. माणुस माणसावर विश्वास ठेवत नाही पण कागदांच्या तुकड्यांवर ठेवतो. अर्थात हे गीतेत सांगितल आहेच.

तुम्ही गेल्यावर परीस्थिती तशीच राहिली. फार पुर्वी स्वकियांची गुलामी केली , नंतर मधल्या हजारो वर्षात परकियांची गुलामी केली, आता परकीय मानसिकतेच्या स्वकियांची गुलामी करतो आहोत.

तुम्ही विचारल खडसावुन कि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय..
आता अस विचारणाऱ्याचाच ठावठिकाणा लागत नाही.
लोकशाही ही ठोकशाही बनली आहे.
राजकारण्याना **गना (***stitues) ,
रक्षकाना रक्षांगना (polistutes) ,
पत्रकाराना पत्रांगना (prestitutes) बोलतात ,
पण बोलणार्याची जीभ हासडण्याचा अधिकार असलेले तुमच्या सारखे कधीच राजकारण आणि पत्रकारितेला पोरक करुन गेले आहेत.

पुर्वी घोटाळ्यात नाव आल तर नेते आणि जनता तोंड लपवायची,
आता पत्रकार परिषदा घेतात आणि निवडणुकीच्या तयारीला लागतात
राजकारणाच्या गजकरणावर निवडून येण्याचा मलम शोधल्यावर सर्वच गोष्टी पवित्र झाल्या.

तुम्ही गेल्यावर तुमच्या नावाने जो टिळक फंड सुरु झाला होता त्यानेच सुरुवात झाली,
कि इंग्रजानी शिकवल ते त्यानाच माहिती,
पण पापाची प्रसिद्धी मिळवुन माणस थोरपदाला पोहचली.

जनतेला सरकारची कामगिरी विचारली तर "भ्रष्टाचार" सोडुन दुसर काही ऐकायला मिळण्याची अपेक्षाच नाही.
विरोधी पक्ष फक्त विरोध आणि पुढच्या निवडणुकीच्या प्रचारापुरताच उरला आहे.

लवकरच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी सुरु होईल. पण देशात समाजात विद्वेशाच विष भिनल आहे.

मवाळ आता टवाळ झाले
जहाल तर मस्तवाल झाले.

सरकारी निधींच्या शेंगा खाऊन पुराव्यांच्या टरफलांचे राजकारण करणाऱ्यांकडून साष्टांग नमस्कार.

वॅलेंटाईन डे आठवडाभर सेलिब्रेट करण्याच्या हक्कासाठी भांडणाऱ्या पिढी आणि पाठिराख्यांच्या वतीने तुम्हाला पुण्यदिनाच्या शुभेच्छा.

ता.क. सर्व भ्रष्टाचार्यांची संपत्ती जप्त करुन जनतेला वाटली तर जनतेला अपचन होईल का? भ्रष्टाचाऱ्याना पुण्य लाभेल कि जनतेला शिव्या शाप?

दिसामाजी काहीतरी ...: आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

दिसामाजी काहीतरी ...: आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या: आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न...

आषाढ अमावस्या आणि गटारी अमावस्या

आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

गटारी अमावस्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीसेक दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.

आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरातील दीप -निरांजन-कलश इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात. कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो. अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.या दिवशी जिवती पूजनही करतात.

साभार : मायबोली मिसळपाव  माझा कट्टा