महात्मा गांधी अहिंसा शांतता आणि भारतीय स्वातंत्र्यलढा

आज महात्मा गांधीजींचा स्मृतीदिन.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी, अहिंसा आणि शांततेचे प्रतीक.

शालेय इतिहासाच्या पुस्तकात गांधींजींच्या अनुयायांनी आणि अहिंसेच्या वारसानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर अनेक प्रकरण लिहिली आहेत, त्यात सुद्धा इंग्रजी अत्याचारांची वर्णन आहेत.

म्हणजेच अहिंसेचा मार्ग इंग्रजांपुढे उपयोगाचा नव्हता. 1920 ते 1942 पर्यंत प्रत्येक अहिंसक आंदोलनात हजारो बळी गेले. त्यांचे रक्त म्हणजे पाणी होते का? मग हि अहिंसक क्रांती कशी?

अहिंसा फक्त बलवानाला शोभते हे इतिहासात सिद्ध झाले आहे. आणि वर्तमानात सुद्धा!

27 वर्षात प्रत्येक ठिकाणी गांधींचे सेवक त्यांच्या भोवती कडे करुन असायचे. इतका लाठीमार गोळी होऊन सुद्धा गांधीजी सुखरुप कसे?
उपवासाने इंग्रजांच मन जिंकता आल असत तर देशात गरीब जनता काय कमी होती ?
गांधीना अपाय झाल्यावर हिंसाचार वाढेल म्हणुन गांधीना सुखरुप ठेवल जात असे.

शेवटी भारतीयसैन्याने उठाव केल्यावर इंग्रज निघाले.
जाताना फाळणी करुन गेले.

गांधीनी 1920 नंतर इंग्रजांचे मन वळवण्यासाठी येशुच्या तत्वांचा आधार घेतला आहे. अगदी 3 माकडा सकट.
फाळणीच्या आणि दंगलीच्या वेळी ते कोणत्या बाजुने उभे राहिले?

शांतता गांधीपुरतीच राहिली. त्यांच्या मागे धावणारी जनतेची डोकी फुटली गोळ्या लागुन जीव गेला.

शेवटी पाकिस्तानात लाखो हिंदु मेल्यावरसुद्धा फक्त हिंदुनाच शांततेच आवहन केल, त्यानंतर भारतात हिंदुंच्या कत्तली सुरु झाल्यावर गांधीनी कोणाची वकिली केली?

गांधींच्या वारसदारानी पण हिंसाच केली शेवटपर्यंत. आणि शांतता तिकडे इंग्लंडातच राहिली.
गांधी आफ्रिकेत जे म्हणाले त्याप्रमाणे भारतात काय केल नक्की? 1920-1948 सर्वात जास्त बळी कोणाचे गेले?

गांधी कृष्णापेक्षा ख्रिस्ताचे भक्त जास्त बनले होते. त्यात चुकीच काहीच नाही, येशुचा शांती आणि प्रेमाचा संदेश सर्वमान्य आहे, फक्त इंग्रजाना सोडुन. ते अत्याचार करत राहिले, आणि गांधीजी अत्याचार सहन करायला शिकवत राहिले.

 पण कृष्णाने शस्त्र धारण केले होते, धर्माच्या रक्षणासाठी कृष्णाने स्वतची प्रतिज्ञासुद्धा मोडली,द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी कृष्णच पुढे आला होता  हे कसे विसरले?

भारतमातेचे तुकडे होत असताना ना ख्रिस्त ना कृष्ण आठवला. फक्त अहिंसेचा पुरस्कार केला. आणि अहिंसा फक्त बलवानाला शोभते. ह्याचा धडा इंग्रजानी 1920 ते 1947 पर्यंत अमानुष राज्य करुन दिला. त्याच जोरावार आजची लोकशाही टीकुन आहे. बघा आजुबाजुला अहिंसक नेत्यांकडे किती खाजगी सेना असते ती.

.
अहिंसेला इंग्रजानी प्रोत्साहन दिले, स्वातंत्र्य लढा का लांबला? स्वातंत्र्य हे भारतीय सेनेच्या बंडानंतरच मिळाले हे सत्य आहे.
अहिंसेने मिळायचे असते तर 1920 ते 1945 मध्ये का मिळाले नाही?

गांधी जिंवत असतानाच दंगे झाले ज्यात हिंदुच निर्वासित झाले, ज्याना नेहरु सरकारने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. दिल्लीच्या थंडी पावसात हिंदुना उघड्यावर टाकणार्या अहिंसेला काय बोलणार? निधर्मीपणा?

ह्याच निधर्मी अहिंसेने देशाचे तुकडे केले, देशावर आणिबाणी लादणारे गांधींच्या अहिंसेचे शिष्य नव्हते का? 1948 मध्ये ब्राम्हणांचे आणि 1984 मध्ये शिखांचे शिरकाण करणारे कोण होते?
 गेली 70 वर्षे काश्मिरी पंडीताना निर्वासित करणार्या अहिंसकाना डोक्यावर घेउन नाचणार का?

अहिंसेच्या मार्गाने न जाणाऱ्या क्रांतिकारकांची फाशी टाळण्यासाठी उपोषण केल्याचे किंवा वॉईसरॉय ऑफिसवर मोर्चा नेला होता का ? दुसऱ्याला स्वातंत्र्यलढ्याच क्रेडीट मिळु नये म्हणून का ?

फाळणीला जबाबदार असणारे मंत्री झाले, भारतरत्न म्हणुन स्वत:लाच पुरस्कार दिले,
त्यांच्या सातशे पिढ्या बसुन खातीक एवढी संपत्ती निर्माण झाली, एकही उद्योग धंदा न करता इंग्लंड अमेरीका युरोपात महाल विकत घेतले फाळणीला जबाबदार असणार्या नेत्यांच्या वारसदारानी.

फाळणीला विरोध करणार्या नेत्यांची वाताहात झाली. जे शिल्लक उरले त्यांच्या मागे खटल्यांची माळ लावुन दिली. का नाही सर्व नेत्याना समान सन्मान मिळाला?

शनी स्त्रीस्पर्श आणि इतर मुद्दे

राहु केतु सुर्य व चंद्राच्या परीक्रमेचे छेदन बिंदु आहेत.

भारतीय खगोलशास्त्रज्ञानी २००० वर्षापूर्वी ९ ग्रहांची आणि इतर ताऱ्यांची माहिती लिहून ठेवली आहे.
आर्यभट्ट वराहमिहिर हि नाव ऐकून माहिती असतीलच.

हे घ्या दुर्बिणीशिवाय शनी बघा nakedeyeplanets.com/index.htm
पण स्वतःच हसु करुन घेउ नका.

शनीतुन स्पंदन बाहेर पडतात कि नाही ह्या साठी शनीवर जायची गरज काय ? सोलार फ्लेअर अनुभवायला सुर्यावर जातात का?
uv किरण असतील तर चव घेउन बघणार का ?

देव देवता ह्या मानसशक्ती आहेत, स्वर्ग नरक ह्या काल्पनिक आहेत, पोथ्या पुराणे ह्या रुपक कथा आहेत, हा तत्कालिन संस्कृतीचा शब्दश: इतिहास नाही. काव्यरुपाने एका पिढीकडुन दुसर्या पिढीत आले आहे हे सर्व.
 पण नैतिक जबाबदारीसाठी ह्या जागांचे मोह आणि भय आहे.

देवाच्या प्रतिमा किंवा देऊळ हे माणसाची कल्पना आहेत. त्यामुळे एखादी मुर्ती आणि लंबाकृती आयत ह्या दोन्ही शनीच्या प्रतिमा आहेत.

प्रत्येक प्रदेशातल्या नैसर्गिक स्थिती प्रमाणे देवाची संकल्पना आहे. त्यामुळे रुप किंवा उत्त्पती किंवा रुढी वेग वेगळ्या आहेत.

प्राचीन साहित्यातात शस्त्रास्त्र मिसाईल्स, आकाशविहाराचे वर्णन आहे जे आज सुद्धा तसेच आढळुन आले आहे. अवयवरोपण व प्लॅस्टिकसर्जरीच्या शस्त्रक्रिया तपशीलात आहेत.

अमेरीकेचे उदाहरण घ्या.तिथे नारायण अस्त्र,पर्जन्यास्त्र, बह्मास्त्र अशी अनेक अस्त्रे व स्त्री-पुरूष वैवाहिक जीवन व महाभारत कालीन जीवन यात साम्य आहे. त्यामुळे जांबूद्विपात समृद्धी होती हे निश्चित.

भारतीय खगोल शास्त्र अमेरिका जपान जर्मनीपेक्षा प्राचीन तरीसुद्धा अचुक आहे.

जपानी सुद्धा त्यांच्या देवळात कर्मकांड करतात.
आणि जर्मन सुद्धा चर्च मध्ये तितकेच धार्मिक असतात.
वर्जिन मेरीच्या कथेवर विश्वास ठेवला तर ते श्रद्धाळु.
राहु केतुंवर विश्वास ठेवला तर हिंदु अंधश्रद्धाळु?

मंगळावर यान पाठवणाऱ्या आधुनिक भारतीय शास्त्रज्ञांनी देवांचे आभार मानले होते. हिंदुंची चेष्टा करणारे इंग्रज आज भारतीय अवकाशातंत्रज्ञानाचा आस धरत आहेत.

हिंदु धर्मात स्त्रीशक्तिला आदिमाया मानले आहे. स्त्रीचा आदर मान सन्मान समानतेने केला पाहिजे अशी शिकवण आहे. समाजव्यवस्थेचा गैरफायदा घेणार्यानी, स्त्रीयाना दुय्यम स्थान दिले.
सती सारख्या प्रथा तिरस्कारणीय आहेतच. स्त्री शिक्षणावर आक्षेप घेणारे मुर्ख आहेत. पण हे धर्माच्या नावाने करणारे नीच हरामखोर आहेत.
मनुस्मृतीत स्त्रियांना हक्क आणि अधिकार आहेत.
गार्गी, अत्रेयी , मैत्रेयी ह्या इसपू काळातील महिला सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या विदुषी होत्या. तेव्हा अरब वाळवंटात आदिमानवी जीवन जगत होते आणि युरोपीय एकमेकांचा जीव घेत होते.

आता तुम्ही म्हणाल भारतीयांचे ज्ञान कुठे गेले.
उत्तर ऐकल तर दुख: होईल का तुम्हाला?

१२ व्या शतकापासुन होणार्या मुसलमानी आक्रमणात ही ज्ञानपरंपरा नष्ट झाली. ईंग्रजानी तर शैक्षणिक आणि वैचारीक  गुलामीच लादली, त्यातुन भारतीय ज्ञानाला कमी लेखणार्या कारकुनी पिढ्यांचे छापखाने तयार झाले.

तरी सुद्धा आज पण आमचा अडाणी शेतकरी पावसाचा आखाडा वेधशाळेपेक्षा चांगला बांधतो.
आयुर्वेदाने असे आजार ठिक होतात जे आधुनिक वैद्यकशास्त्राला जमत नाही.
महाभारत रामयणातली अवकाश प्रवासाची वर्णन खरी कशी ह्याच उत्तर द्यायला जड जाईल तुम्हाला.
 सुश्रूताने शस्त्रकिया यशस्वी केल्याच माहिती नसेलच तुम्हाला. अवकाश विद्येची पुस्तक नष्ट झाली म्हणुन आसुरी आनंद का?
 गणित भुमिती खगोल अवकाश वैद्यक ह्या शाखात भारतीय ज्ञान परीपुर्ण होते व आजसुद्धा वापरता येते.
पण पाश्चात्य विज्ञान खुप ठिकाणी चुकले आणि प्रत्येक शतकात बदलत गेले. आपण लादल गेल आहे म्हणुन पाश्चात्य ज्ञान प्रमाण मानतो. त्याला प्रणाम करायची गरज नाही.