धर्म आणि रक्षण

दंगल झाली तेव्हा लपुन बसलेल्या निधर्मी सहिष्णुतावाद्यांचे रक्षण सेनेच्या वाघानी केले.

धर्म नाकारता तुम्ही ?
तुमचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणारे जवान धर्म सोडत नाहीत,
तुमचा जीव वाचवण्यासाठी झटणारे डॉक्टर धर्म नाकारत नाहीत,
ज्यांच्या जीवावर तुम्ही प्रसिद्धी मिळवता त्या facebook google twitter news चे मालक धर्म नाकारत नाहीत.
इतकच कशाला ते भारतात येतात मन:शांती साठी तेव्हा हिंदु मंदीर आणि संताकडेच शरण जातात.
तुम्ही कोणत्या आधारावर हिंदुत्वाला दोष देता ?
ज्यानी हिंदुत्व समजावुन घेतलेच नाही, ते सनातन वैदीक ब्राम्हणी वगैरे बडबडत राहिले. खरे हिंदुत्व सर्व जाती-पंथांच्या एकीत आहे.

ह्या एकीलाच मुघल-इंग्रज घाबरत होते म्हणुन त्यानी जाती-पातीत भांडण सुरु केली.
आज सुद्धा त्याच द्वेशाचे विष चाटुन हिंदुत्व विरोधी उलट्या करत आहेत.

भारतीय म्हणुन जगायच म्हणजे कस?

जिथे जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक कागदावर जात-धर्म लिहावा लागतो ,
जिथे जात-पात आणि धर्मावर आरक्षण मागितल जाते,
तिथे फक्त भारतीय म्हणुन कस जगायच ?

हिंदुत्व, जातीयवाद आणि आरक्षण

रोमन-प्रोटेस्टंट , शिया-सुन्नी असे ख्रिश्चन मुस्लिम धर्मियात जाती-पंथ आहेत, पण संविधानाचे हक्क लाभ अधिकार आरक्षण घेताना ते फक्त ख्रिश्चन किंवा मुसलमान असतात. कोणताही ख्रिश्चन किंवा इस्लामी धार्मिक नेता स्वत:च्या पंथासाठी वेगळे आरक्षण हक्क मागत नाही.
हिंदुंवर टीका करताना तर एकजुट असतेच
ह्यातुन काय शिकावे : धार्मिक एकता.
आपापसात कितीही भांडले तरी परक्यांविरुद्ध एकत्रच येतात.

आरक्षणाची वेळ येते तेव्हा हिंदुन्मध्ये शेकडो जाती दाखवल्या जातात. प्रत्येक जातीचा एकतरी नेता असतो. पण आज पर्यंत ह्या जातीयवादी नेत्याना एकत्र येऊन जातींमधले भेद मिटवता आले नाही, प्रत्येक वेळी फक्त तेढ वाढते.

गेली 60 वर्षे आरक्षण असुनही हिंदु जाती मागासच कश्या ? आरक्षणाने प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली. ह्याचे खापर हिंदुत्वावर फोडण्यात येते. पण सत्तेवर तर कायम हिंदुत्वविरोधी पक्षच होते. गरीबी हे आमचा दागिना असल्याचे सतत सांगितले गेले. रोजगार देण्याऐवजी भत्त्याच्या नावाखाली भीक मागण्याची सवय लावली गेली.
मग सर्व संधी अधिकार असताना सुद्धा कमी न झालेल्या जातीयवादाला जबाबदार कोण ?

परदेशी देणग्यांवर पोसलेले निधर्मी-सर्वधर्मी विचारवंत पुस्तक व्याख्यान चर्चासत्र भरवुन हिंदुना हिंदुत्वाविषयी गैरसमज करणारे पोस्ट मेसेज शेअर करतात. त्यामागचे सत्य जाणुन न घेता, तथाकथित बुद्धीवादी तेच उष्टे चघळत बसतात.

जगातल्या सर्व आधुनिक आणि विकसीत देशाना स्वत:चा धर्म आहे, सर्व जागतिक नेते स्वत:ची धर्म चिन्हे अभिमानाने मिरवतात.
सोशल किंवा न्युज मिडीयाचे मालक धार्मिक असतात, आपल्याला विकणायात येणारी प्रत्येक वस्तु व सेवा धार्मिक व्यक्तीच बनवतात. आपले रक्षण करणारे सैनिक व पोलिस धार्मिक असतात, आपले आयुष्य वाढवणारे डॉक्टर धार्मिक असतात.

मग आपणच मागे का? कारण परकिय आक्रमण होत असताना आपण विज्ञानापेक्षा धार्मिक रुढीना महत्व दिले, जर रुढी मागचे ज्ञान परखडले असते आणि ज्ञानसाधनेची तपश्चर्या केली असती तर आज आपण विज्ञान व धर्म हया दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ असतो.

आंबेडरकर , समाज आणि आरक्षण

सध्या दलित - मुस्लिम ऐक्याचे वारे वहात असल्याचे भासवले जाते.

आंबेडकरानी हिंदु ख्रिश्चन आणि इस्लाम हे तीन्ही धर्म नाकारले होते, मग हि एकी कुठुन आली?

जर अशी एकी अभिप्रेत असती तर आंबेडकरानी बौद्ध धर्म स्विकारला नसता,  इस्लाम कुबुल केला असतात. तसे घडले नाही, मग आता काय झाले?

हा आंबेडकरांचा विश्वासघात कि जनतेचा ?

आंबेडकरानी जे 60 वर्षांपुर्वी नाकारले तेच आज जनतेच्या माथी मारले जात आहे का?

बौद्ध म्हणायला हवे पण नेतेच दलित असा उल्लेख करुन जखम भळभळती ठेवत आहेत.
बौद्ध-मुस्लिम एकी नाही म्हणत. दलित-मुस्लिम म्हणतात, म्हणजे समाज कुठेही असला तरी दलितच का? का मागास ठेवला आहे समाज गेली 60 वर्षे? हिंदु धर्म अन्याय करुन प्रगती रोखत होता, आरक्षणानंतर सुद्धा समाज मागास दलितच कसा राहिला?

ज्यांचा उद्घोष केला जातो त्या भीमरावांचा आदर्श ठेवुन निम्मे सुद्धा शिक्षण पुर्ण करु न शकलेले नेते बनले. ज्यानी जिद्दीने शिक्षण घेतले ते जातीपासुन दुर झाले. असे का ह्याचा अर्थ गेल्या 60 वर्षात कोणत्याच नेत्याने समजावुन सांगितला नाही.

ब्राम्हण उच्चवर्ण सवर्ण वैदीक अन्याय असे शब्द वापरुन समाजत तेढ वाढवली गेली, पण एकही समाजउपयोगी कार्य दिसले नाही.

आंबेडकरानी आरक्षण हे हजारो वर्षे अन्यायाच्या खाईत पडलेल्या समाजाच्या उन्नतीचे साधन मानले होते.

पण आज आरक्षण हे कुंपण आहे.

आरक्षणाने निवडणुका जिंकता येतात.
जगण्याच्या शर्यती नाही.

तिथे कुंपण ओलांडणाराच संघर्ष करु शकतो.

दुर्दैवाने आज ज्यानी कुंपण मोडुन जग जिंकण्यासाठी मर्गदर्शन करायला पाहिजे, ते कुंपणाचे फायदेच सिद्ध करत आहेत.